भर मध्यान वेळेला
का काळोख दाटला
माझ्या मनावर का रे
असा मळभ हा आला.
कोण्या दुःखाची ही छाया
सारीकडे पसरली
तेवढ्यात दूर कुठे
अशा सुखाची दिसली….
भर मध्यान वेळेला
का काळोख दाटला
माझ्या मनावर का रे
असा मळभ हा आला.
कोण्या दुःखाची ही छाया
सारीकडे पसरली
तेवढ्यात दूर कुठे
अशा सुखाची दिसली….
ओठांवरती हसू तुझिया,
नयनांमधुनी सोडशी बाण,
वाऱ्यावरती केस नाचती,
बघता तुजला नुरते भान….
सुना है ये जहाँ
सजना तेरे बिना
इस ख़ामोशी की जुबाँ
जिसे तू क्यों समज़े ना.
इन लम्होकी ये दूरियाँ
जैसे गुजरी कई सदियाँ
बात की है इन आंखोने
क्यों तुम तक ये पहुचे ना.
लगी सावन की है जो झडी
हर अंग जो सुलगाए
इस सुलगनेकी दासताँ
क्यों तुमको ये भाए ना.
क्षणात एका नाव बदलते,
नावासंगे बदले जीवन.
जणू जन्म तो नवा मिळाला,
नवीन आहे माझे मीपण.
माहेरीच्या अंगणातून तो
पाय निघे ना जड तो होऊन.
कर्तव्याची जाणीव ठेऊन,
तरी उचलला पाय स्वताहून,
कोड कौतुके माहेराची
तसेच गोळा केली माया,
सारी येथे पुन्हा पेरली,
नाती ही नवीन रुजवाया.
या वैशाख वणव्याची
नाही सोसत काहिली
काळ्या मेघांच्या छायेची
वाट साऱ्यांनी पाहिली.
वाट पाहून पाहून
पाणी डोळ्यांचे आटले.
निसर्गाचे चिडले मन
तेव्हा कुठे ते द्रवले.
खायी है जख्म गहेरी,
भरा नहीं है घाव अभी.
चेहेरेसे नकाब हसिका,
फिरभी नहीं उतरा कभी.
चलते रहे बरसातोमे,
आसुओंको छुपाते हुए.
ना दिखे कभी वो किसीको,
दिलमे यही तमन्ना लिए….