उठा है तुफान क्यू सारे दरिया मे,
अकेला झुंजता मै इस कश्तीमे.
कभी कभी उठती है लेहर पहाडसी
गोते लागती है कश्ती उसिमे.
बैठता है वो डर गेहेरा कही दिलमे
फिरभी इक आशा है छुपी उसीमे.
है उसे सहारा उसी इक आस मे
उस इक रबपे भरोसा है दिलमे.
उठा है तुफान क्यू सारे दरिया मे,
अकेला झुंजता मै इस कश्तीमे.
कभी कभी उठती है लेहर पहाडसी
गोते लागती है कश्ती उसिमे.
बैठता है वो डर गेहेरा कही दिलमे
फिरभी इक आशा है छुपी उसीमे.
है उसे सहारा उसी इक आस मे
उस इक रबपे भरोसा है दिलमे.
कळेच ना कधी कधी
का असेच व्हायचे,
लोकशाहीच्या राज्यातही
लोकांनीच पिचायचे.
नावाचीच लोकशाही ती
नावापुरते हक्क,
यांच्या मनमानीने सारे
झालेत आता थक्क.
दरवाढीचा भडका सोसत
ट्यक्सदेखील भरायचे,
यांनी मात्र सगळेच नुसते
फुकट चापायचे.
साऱ्या सिस्टीमचाच उडालाय
पुरा बोजवारा.
सर्वात मोठ्ठ्या लोकशाहीचा
हा आहे घोषवारा.
आला वसंत हा आला,
सारी सृष्टी आनंदली
त्याच्या स्वागताला पहा,
सारी बाग ही फुलली
जागोजागी फुलले हे,
पहा फुलांचे ताटवे
जणू ओलेतीने कसे
सोळा शृंगारी नटावे.
नाते जुळले मैत्रीचे
चुकूनही विटत नाही
मउसुत धागे रेशमाचे
घट्ट वीण सुटत नाही.
कळत नाही किंमत म्हणजे
असते अशी काय गम्मत.
कशाच्या आधारावर ठरते
तुमची आमची असली किंमत
चमचमत्या हिऱ्यासदेखील ,
क्वचित मिळत नाही किंमत
काळ्याकुट्ट कोळश्यालाही
कधी येते प्रचंड किंमत
कधी बाजरी न येऊन त्या
माल घेतो प्रचंड किंमत.
घोटाळ्यांच्या अडून कितीदा
खोटीच दिसते त्याची किंमत.
उंच अशा त्या आकाशाला
कधी पोचते झटकन किंमत
खाली येताना का होते,
कासावाहुनही हळू किंमत.
पाण्याच्या त्या कारंज्यासम
थुइथुइ नाचे बघ ती किंमत.
कोणा उमगले आहे कधी हे
कशी ठरते कोणाची किंमत.
आपल्या कडून अनपेक्षितपणे घडलेल्या गोष्टींचा पुढे काय परिणाम होईल याची कधी कधी आपल्यालाच कल्पना येत नाही. त्या वेळी खरतर ती कृती खूपच क्षुल्लक असते, म्हटलं तर नगण्य. आपल्याला माहितीही नसतं आपल्याकडून काय झालाय. आणि आपण पुढे निघून जातो. पुन्हा त्याबद्दल विचारही येत नाहीत. पण त्यानंतर होणाऱ्या घटना आपल्यापर्यंत पोहोचत नाहीत.