काल सहज म्हणून रात्री पूर्वी दूरदर्शन वर प्रसारित होणाऱ्या चंद्रशेखर द्विवेदींच्या ‘चाणक्य’चे काही भाग बघत होतो. अचानक आर्य चाणक्याच्या तोंडी असलेला एक उतारा सध्याच्या परिस्थितीला इतका चपखल बसणारा वाटला. सगळ्याच समाजांतून परस्परांविरुद्ध गरळ ओकायचे काम चालू आहे. आपले सन्माननीय संसद-सदस्य देखील स्वतःचे दायित्व सोडून धर्म, पंथ द्वेषाची विधाने आणि आरोप प्रत्यारोप करण्यात धन्यता मानत आहेत. तथाकथित धर्मगुरू आणि धार्मिक नेते आपणच काय ते श्रेष्ठ आणि बाकी सारे कसे मूर्ख आहेत हे सांगण्यात मग्न आहेत. सगळीकडेच कट्टरतेचे विष पसरते आहे. समाजमनात खोलवर भिनत जात आहे.
या साऱ्या पार्श्वभूमीवर आर्य चाणक्याचे ते शब्द बाणासारखे थेट मनापर्यंत पोचतात आणि डोळ्यात झणझणीत (more…)
