
आषाढाच्या धारा आल्या कोसळल्या बरसून
संगे आला त्यांच्या वारा फिरे पुरा भणाणून
उघडीप जरा नाही, सारे मळभ भरून
दाटे काळोख दिवसा येई पुरे अंधारून
रस्ते सारे आज ओस, पाणी साचले राहून
जरी आडोशाला होते, गेले पक्षीही भिजून
हेच नेहमीचे झाले, नवा दिवस असून
काटे घड्याळाचे जणू कसे थांबले थकून
कधी डोकावेल सूर्य, काळ्या ढगांच्या अडून
हीच एक आहे आस आता मनात दडून …
PS: The post is a part of #BlogchatterBlogHop.www.theblogchatter.com


Leave a Reply