Category: Marathi

  • ८ वर्षाचे चरित्र….

    या लेखाच्या सुरुवातीलाच मला प्रांजळ पणे सांगावे वाटते कि मला कोणावरही वैयाक्क्तिक टीका करायची इच्छा नाही. पण लिखित स्वरुपात काही समोर आले म्हणून हे लिहावे वाटले. आज काही पुस्तके मागवावीत म्हणून इंटरनेटवर शोधात होतो, अचानक पणे पुस्तक समोर आले ते श्री राहुल गांधी यांच्या चरित्राचे. त्यांनी कार्य केले यात वाद नाही, सन २००८ पासून ते लोकसभेचे सदस्य आहेत. साहजिकपणे त्यांनी त्यांच्या मतदारसंघात काम केले असेलच. शिवाय कोंग्रेस पक्षाचे युवा नेते आहेत, शिवाय कार्यकारी मंडळात मनाच्या आणि प्रतिष्ठेच्या पदावर आहेत.

    त्यांच्याबद्दल पुस्तक लिहिले जावे याबद्दल माझे काही म्हणणे नाही पण सन २००८ ते २०१२ या केवळ ४ – ६ वर्षांच्या कार्यावर चरित्रलेखन करणे कितपत योग्य वाटते? राहुल यांच्या मातोश्रींचे चारित्र्य लिहिले तर ते निश्चितच योग्य ठरेल कारण आज त्या इतके वर्ष भारतीय राजकारणात सक्रीय आहेत आणि राजीवजींचा वारसा अगदी समर्थपणे पेलत आहेत. अनुभव समृद्ध अशी कारकीर्द आहे.

    चरित्र लेखनासाठी किमान १५ – २० वर्षांची कारकीर्द असावी असे माझे वय्यक्तिक मत आहे. या कालावधीत चरित्रनायकाच्या मातांना निश्चित दिशा मिळालेली असते. ठळकपणे दिसतील अशी गुणवैशिष्ठे समोर आलेली असतात. कारकीर्दीमध्ये ठोस असे काही कमावलेले असते. मैलाचे दगड पार केले जातात. आज राहुल गांधी तरुण आहेत. अजून खूप वर्ष कारकीर्द बाकी आहे. निश्चित ते काही खास कार्य करतील. पण या आधीच चरित्र लिहिले तर नंतरच्या कार्याला न्याय मिळणार नाही. आत्ता लिहिलेले चरित्र चूक आहे अथवा त्यात काही कमतरता आहे अशातला भाग नाही पण पुढे होणाऱ्या घटना अत्यंत महत्व असू शकते, भारत राष्ट्राच्या दृष्टीनी. राहुल गांधींच्या कारकीर्दीच्या दृष्टीनी. आज राहुल गांधींना पंतप्रधान पदाचा उमेदवार म्हणून बघितले जाते. त्यांच्या भविष्यातील त्या कार्याची दखल कशी घेणार.

    चरित्र लिहिले याबद्दल आक्षेप नाही पण लेखकांनी प्रकाशन करण्यासाठी थोडे थांबायला हवे होते. कदाचित अजून काही महत्वाचे घटनाक्रम त्यात आले असते. भारतीय राजकारणाला मिळणाऱ्या काही अजून वळणांचा उल्लेख त्यात आला असता. अजून काही वर्षांनी पुन्हा चरित्र लेखनाचा लेखकाचा त्रास वाचला असता. आणि आपल्याला एक परिपूर्ण जीवनालेख दाखवणारे उत्तम चरित्र वाचायला मिळाले असते.

  • संजीवन

    क्षणात एका नाव बदलते,
    नावासंगे बदले जीवन.
    जणू जन्म तो नवा मिळाला,
    नवीन आहे माझे मीपण.

    माहेरीच्या अंगणातून तो
    पाय निघे ना जड तो होऊन.
    कर्तव्याची जाणीव ठेऊन,
    तरी उचलला पाय स्वताहून,

    कोड कौतुके माहेराची
    तसेच गोळा केली माया,
    सारी येथे पुन्हा पेरली,
    नाती ही नवीन रुजवाया.

  • वणवा

    या वैशाख वणव्याची

    नाही सोसत काहिली

    काळ्या मेघांच्या छायेची

    वाट साऱ्यांनी पाहिली.

    वाट पाहून पाहून

    पाणी डोळ्यांचे आटले.

    निसर्गाचे चिडले मन

    तेव्हा कुठे ते द्रवले.

  • आँसू

    खायी है जख्म गहेरी,
    भरा नहीं है घाव अभी.
    चेहेरेसे नकाब हसिका,
    फिरभी नहीं उतरा कभी.

    चलते रहे बरसातोमे,
    आसुओंको छुपाते हुए.
    ना दिखे कभी वो किसीको,
    दिलमे यही तमन्ना लिए….

  • धार

    शब्दांची ती धार कधीही
    चालवणाऱ्या कळतच नाही
    झेलाणाऱ्याच्या हृदयावारल्या
    जखमा त्याला दिसत नाही.

    जखमेवरती फुंकर सोडा,
    पुनःपुन्हा ते वारच होती.
    नाजुकशा वेड्या मनाची,
    क्षणात एका शकले होती.

    विखुरलेली ती शकले सारी,
    गोळा करता नवीन घाव.
    कसे तुला रे कळतच नाही,
    झेलू कुठे हे नवीन घाव.

  • चोर चार

    एकदा झाला चमत्कार
    स्वप्नात आले चोर चार

    म्हटले काढून मोठ्ठा सुरा
    असेल ते सारे देऊन टाक पोरा

    घाबरत त्यांना मी आत गेलो
    थांबा, असेल ते घेऊन आलो

    पळत पळत आत गेलो
    रद्दीची पिशवी घेऊन आलो.

    रद्दी बघून ते जास्तच चिडले
    मारायला मला पटकन धावले

    म्हणालो, काका जरा थांबा
    काय म्हणतो, ते तरी ऐका

    उशिरा येऊन बघा केला घोटाळा
    सारं लुटून गब्बर आत्ताच गेला.

    जमला तर एक काम करा
    रद्दी तेवढी विकून टाका

    आईला रद्दी दिसली जरी
    राग येईल तिला भारी

    मला आई खूपच ओरडेल
    तुम्हाला तर चोपुनच काढेल

    मार खायची असेल तयारी
    येईलच थांबा तिची स्वारी.

    चोप म्हणताच ते भ्याले फार
    पळून गेले चारच्या चार….