Category: ललित

  • सुट्टी

    सुट्टी म्हटलं की सगळ्यांना आठवत ती शाळेतली सुट्टी, मग ती मे महिन्याची उन्हाळी सुट्टी असो किंवा दिवाळीअसो. अर्थात दोन्ही सुट्ट्या तशा वेगळ्याच. दोन्हींचे आनंद वेगळे, दोन्हीत करायची धमाल वेगळी. उन्हाळी सुट्टी मित्रांबरोबर आईच्या ओरद्ण्याला न भीक घालता भर उन्हात धुडगुस घालायची तर दिवाळीची सुट्टी मामाच्या घरी, माविकडून किंवा आजी आजोबांकडून लाड करून घेण्यात घालवायची. पण शाळा संपली तशी ही हक्काची सुट्टी पण कुठे गुडूप झाली देव जाणे.

    वाटलं होतं, कॉलेजला गेलो की सगळेच दिवस तसे सुट्टीचेच असतील पण कसले काय. (more…)

  • थोडे आत डोकवा

    काल सहज म्हणून रात्री पूर्वी दूरदर्शन वर प्रसारित होणाऱ्या चंद्रशेखर द्विवेदींच्या ‘चाणक्य’चे काही भाग बघत होतो. अचानक आर्य चाणक्याच्या तोंडी असलेला एक उतारा सध्याच्या परिस्थितीला इतका चपखल बसणारा वाटला. सगळ्याच समाजांतून परस्परांविरुद्ध गरळ ओकायचे काम चालू आहे. आपले सन्माननीय संसद-सदस्य देखील स्वतःचे दायित्व सोडून धर्म, पंथ द्वेषाची विधाने आणि आरोप प्रत्यारोप करण्यात धन्यता मानत आहेत. तथाकथित धर्मगुरू आणि धार्मिक नेते आपणच काय ते श्रेष्ठ आणि बाकी सारे कसे मूर्ख आहेत हे सांगण्यात मग्न आहेत. सगळीकडेच कट्टरतेचे विष पसरते आहे. समाजमनात खोलवर भिनत जात आहे.

    या साऱ्या पार्श्वभूमीवर आर्य चाणक्याचे ते शब्द बाणासारखे थेट मनापर्यंत पोचतात आणि डोळ्यात झणझणीत (more…)

  • तव आठवणींच्या संगे, कित्येक रात्री सरल्या.
    तव विरहाने हृदयावर, बघ कट्यारी चालल्या ||
    तुझी संकेताची खुण, मनोमानी ती पटली,
    त्याक्षणी रे मनात, लक्ष कळ्या उमलल्या ||
    बाहुपाशात तुझ्या रे, जेव्हा मी सामावले,
    साऱ्या रोमारोमातून, विद्युलता चमकल्या ||

  • नातं: हळुवार फूललेल

    प्रत्येक नातं कुठल्यातरी व्याख्येत बसवायचीच आपल्याला फार घाई असते बघा. कोणत्याही दोन व्यक्ती जर एकत्र आल्या तर त्यांना नात्यांच्या चिठ्ठया चिकटवण्यातच आपल्याला फार स्वारस्य असते. दोन व्यक्ति एकत्र आल्या, सुर जुळले आणि एकमेकांत प्रेमाचा ओलवा निर्माण झाला. बस् इतके साधे सोपे गणित त्या दोघांना का मांडू दिले जात नाही? कोणते न कोणते नात्याचे लेबल चिकटवायलच हवे का?

    मुळात जर दोन व्यक्ति एकमेकांच्या ओठावरील हास्याचे (more…)

  • Made in India

    Recently our honourable Prime Minister launched campaign about “Make in India” and they started marketing it on the global platform. Government is also talking about giving some kind of appeasements to the industrialists in terms of policy changes. Soon after the gaining power in important state of Maharashtra, BJP led government took similar course of action and started propagating “Make in Maharashtra”. First act of this campaign was to meet with key personnel of all industrial biggies like reliance, kalyani and Parimal groups. Main topic for discussions for the meeting was about reducing clearances required for setting up new plants in Maharashtra.

    According to all the news came in both (more…)

  • इतिहास, वर्तमानाचा आदिपुरुष!

    आज या क्षणी आजूबाजूला जे घडतंय त्याची बीजे भूतकाळात पेरलेली असतात असं आपण सतत ऐकत असतो. पण फुकाचे तत्वज्ञान म्हणून त्याकडे दुर्लक्ष करत आपण कायम पुढे निघून जातो. याच पुढे निघून जाण्यानी कदाचित आपण स्वतःच्या भविष्यावर काही परिणाम करत असू. बऱ्याचदा अशा गोष्टी आपल्याला धार्मिक, अध्यात्मिक वगैरे वाटतात. पण अगदीच व्यवहारी विचार केला तरी यात भरपूर तथ्य असल्याचे लक्षात येतं. अगदी अत्ताचेच उदाहरण घ्या नं. अटलजींच्या सरकारनंतर आलेल्या सं पु आ च्या सरकारच्या कामगिरीवर सारेच नागरिक नाराज होते. त्यामुळेच तर इतक्या प्रचंड प्रमाणात एकच पक्षाला बऱ्याच दशकांनी स्पष्ट बहुमत मिळालं आहे.

    (more…)