माझ्या मनीचे ते गुज,
ओठी कधी आले नाही.
त्या मौनाचा तो अर्थ,
तुला कळलाच नाही.
सांगायचे होते खूप,
बोलायला शब्द नाही.
मौन ऐकायला कधी,
तुझ्यापाशी वेळ नाही.
अधुरीच आता राहे,
या मौनाची कहाणी.
वाट वेगळ्या धरल्या,
तुझ्या माझ्याही मनानी.
माझ्या मनीचे ते गुज,
ओठी कधी आले नाही.
त्या मौनाचा तो अर्थ,
तुला कळलाच नाही.
सांगायचे होते खूप,
बोलायला शब्द नाही.
मौन ऐकायला कधी,
तुझ्यापाशी वेळ नाही.
अधुरीच आता राहे,
या मौनाची कहाणी.
वाट वेगळ्या धरल्या,
तुझ्या माझ्याही मनानी.
त्यांना सतत शिव्या घालतो,
सिग्नल तोडून पळताना पकडल्यावर,
हळूच एक नोट सरकवतो….
कोणाचा किती टक्का यावर,
सत्यमूर्ती गांधीजी आपले,
निमूट हसतात नोटेवर…
कधी राज, कधी रण,
सामान्य मात्र भोगतोय,
आश्वासनांच “राजकारण”
आला बघा कंटाळा,
राग पक्षांतर गाऊन जरा
आजमावावा म्हणतो गळा…..
कधीतरी पसारा आवरताना लागते हाती एक गाडी,
तुझा हट्ट पुरवताना मी मात्र झाले होती वेडी.
तुझं वाढतं वय घेऊन गेलं तुझा हट्ट,
अजूनपण वाटतं येऊन तुला मिठीत घ्यावं घट्ट.
नोकरी संसारात गुरफटून गेलायस खूप लांब,
कधीतरी परत येऊन मला तुझ्या गमती सांग.
पळत दारात येऊन “आई भूक….” म्हण.
बघ तुझ्या आठवांच्या झोपाळ्यावर झोके घेतं वेडं मन.
माणसाला आयुष्यात हवा असतो एक गोंधळ,
कायम आपल्याभोवतीच घातला जाणारा..
अगदी जन्माला आल्यापासूनच हट्ट असतो,
सतत गोंधळ मागण्याचा.
अगदी लहान असतो नं तेव्हाच या गोंधळाची होते सुरुवात,
सुरवातीलाच मंजुळ आवाजाचा मजा देणारा एक गोंधळ घेऊन खेळणी येतात.
या खेळण्यांचा तो गोड गोंधळ हळूच मागे सोडतो,
आणि आपण आपसूक बागीचातल्या गोंधळात रमतो.
मागोमाग येतोच शाळेचा धमाल मस्तीचा गोंधळ,
बागेतल्याला सोबत नको का कुणाची?
शाळेतला धिंगाणा आठवणीत ठेवून मग येतो एका मोठ्ठ्या गलक्यात,
महाविद्यालयाच्या हो..
तिथेच भेट होते ती एका नाजूक जिव्हाळ्याच्या
अगदी हवाश्या गोंधळाची जो थेट आपल्या मनाचाच ताबा घेतो.
पुढे हा चोरून लपून दोघांनी घातलेला गोंधळ घरचा होतो,
अगदी देवा ब्राह्मणांच्या साक्षीने.
एका आवडीच्या गलक्याला सुरवात होते.
जोडीनी चालवायच्या गाडीचा आनंदासकट,
एक कुटुंब समाधानानी गप्पाष्टकांचा गोंधळ मांडत.
हळूच एक बारीक नवजात आवाज येतो,
आणि सगळा गोंधळ स्वतःभोवतीच जमा करतो.
या सगळ्या गोंधळ गालाक्याची मजा घेत जगत असतो आपण,
हळूच कधीतरी येते त्या शांततेची चाहूल.
मन सुन्न करणारी ती शांतता, कधीही नं अनुभवलेली,
कधीच नको असलेली…..
ती शांतता मागे टाकून जोर एकवटून आपण झेप घेतो,
झेलायला तो असतोच हजर, हो तोच तो… लाडका गोंधळ…
आपल्या साऱ्या सख्या सोबत्यांबरोबर.
मग की खूप जास्त गोंधळ, गडबड, धिंगाणा,
मजा आणि असतो आपल्या आवडीचा गलकादेखील.
सगळी मजा करताना अगदीच अचानकपणे;
आपण निघून जातो….
खूप खूप दूर कायमचे,
एका अखंड शांततेच्या प्रवासाला.
काही आठवणींचा आवाज कुणाच्या तरी ओंजळीत टाकून,
त्याचा कधी तरी प्रचंड गोंधळ होईल या वेड्या आशेवर…….
आज फेसबुक वर भटकत असताना एक कविता वाचनात आली.
ती विद्वान गार्गी तू, द्रष्टी त्या सुक्तांची.
राणी झाशी वाली तू , राणी तू मुक्तांची.
ती जिजाऊ आई तू, शिल्पकार राजाची.
ती अहिल्या भोपाळीची, मूर्ती सुधारणांची.
माते तुजविण होतच नाही, कल्पनाही विश्वाची.
तू तर देवी आधाराची, मुळे या जगताची.
आदित्य साठे
१२-०४-२०११