Category: प्रासंगिक

  • Hello, 2025! I am sure you will be good.

    Hello, 2025! I am sure you will be good.

    It’s already the 20th day of the first month when I am writing this one. The days are zooming fast with a lot of things happening around and with me. Before we started 2025, in one of the twitter threads during ’24 wrap up, I mentioned a few of my goals in it. Some of them are personal. Some are professional stuff. I think when I start the blogging journey of 2025, it will be good to expand on them a bit here.

    When I look back at 2024, it has been a mixed bag of joy and sadness, achievements and failures. Some things worked out well, some failed miserably. I know this is what life is, and yet, all of us feel those strong emotions of happiness, sorrow and anger when things go either way! This is what #BeingHuman is, I guess!

    Hey 2025, Let’s do this!

    Coming back to 2025, and what I want to get done in this year. I guess now I have moved on from the resolution phase. Resolutions put too much pressure on me. I feel goals are more accessible, achievable and manageable. You can take a review of your progress, alter your course, and reach the goal. However, in resolution, if it breaks, there’s no turning back.

    So, there are some goals I set for 2025.

    Top post on Blogchatter

    Personally, I want…

    1. Thankfully 2024 didn’t throw any tantrums regarding health issues neither physical nor mental. I expect the same from ’25. In this year, I would like to be more mindful about my health, both mental and physical. So, I will try to build healthy habits.

    2025 year of self care

    2. All of you who have been supporting and showering me with your love support for this blog are aware about my love for the books. I am a bibliophile through and through. Books are one thing which gives me a lot of joy and peace. I read or listened to 50 books in 2024.

    For this year, I am making one book per week. So, 52 for the ’25.

    3. Blogchatter retreats were highlights for the past couple of years. Varanasi and Kolkata have given me a lot in terms of creativity. I would like to travel more in the coming year. I would like to have some more short trips to get more vitamin sea other than the upcoming #BlogchatterRetreat!

    Seeing more sea in 2025

    Professionally, I want…

    1. I am a professional mapmaker. So when I think about my professional goals, in 2025, I would like to be more creative when I make those maps. I want to make them easier to understand, attractive and interactive using new technologies.

    learning new mapping tech in 2025

    2. 2020 was also the youtube year for many creators including me. I could gain more than 100 followers by uploading videos consistently for 4 months and then momentum just crashed. I wish to take it up again in 2025, with renewed light and may be renewed content.

    Maybe, I will bring in some bookish content to Adi’s Journal YT.

    3. I have been writing poetry for more than a decade. I have my first poetry collection published in 2021. Now, I want to put my first paperback book out for the world to read. Not sure if it’s going to be published by a publisher or by myself. But I want it to take shape this year!

    First paperback?

    Have you guys set any such goals for you? Share them in the comments. Let’s keep motivating each other.


    To read more of my writing, feel free to browse other pages of Adi’s Journal.

  • भेट एका चित्र-तपस्वीची

    भेट एका चित्र-तपस्वीची

    दिवाळी अंक, चित्र आणि लेखन या साऱ्या बद्दल अत्यंत दांडगा अनुभव असलेल्या एका महान व्यक्तीची काल भेट घेण्याचा योग आला तो Prose Publications  च्या आमच्या साहित्यकट्ट्याच्या निमित्ताने. श्री. चंद्रमोहन कुलकर्णी, कित्येक वर्षांची चित्र-तपस्या असलेला एक सुंदर कलाकार! अनेक पुस्तकांची मुखपृष्ठे, दिवाळी अंकातील साहित्याला अनुरूप किंबहुना कित्येक वेळा त्या साहित्यातील एक वेगळाच पैलू उजेडात आणणारी चित्रे रसिक वाचकांच्या हातात देणारा हा कलाकार कट्ट्यावर अगदी मनमुराद ऐकता आला. 

    हो, अगदी बरोबर वाचलं तुम्ही. ऐकता आला. चंद्रमोहन जी हे जितके भन्नाट चित्रकार आहेत तितकेच उत्तम लेखक देखील आहेत. त्यांची कुंचला आणि लेखणी, दोन्हीवर जबरदस्त पकड आहे. काल त्यांच्याशी गप्पा मारताना त्यांनी मांडलेला एक विचार मनात घर करून गेला. कित्येकदा साहित्यावर किंवा कथेसाठी चित्र काढताना त्या कथेतील एखादा भाग निवडून त्याच चित्रण होतं. पण या मुद्द्यावर त्यांचं मत मांडताना चंद्रमोहन म्हणाले, “चित्रकाराने कथेलाही काहीतरी द्यायला हवं.” कथेचा आपल्या स्वतःच्या दृष्टिकोनातून विचार करून आपलं काही आकलन त्या चित्रांतून आले तर अधिक कलात्मक निर्मिती होईल. 

    इतर कलांकडे डोळस नजरेने बघत त्यांचा आस्वाद घ्याव, तुमच्या दृष्टिकोनातून तो अनुभव पुढे नेण्याचा प्रयत्न करावा. यातूनच कलाकार म्हणून आपलं भावविश्व समृद्ध होत असतं. कालच्या कट्ट्यावरच्या गप्पांतून चंद्रमोहनजींनी असेच माझ्या भावविश्वाच्या अकाऊंट मधे अजून एक फिक्स डीपॉझिट तयार केले. या नवीन इनव्हेस्टमेंट साठी कट्ट्याला खूप खूप प्रेम!

  • Aura Around Disability

    Aura Around Disability

    Today is a proud moment for India as a country. Two of our athletes bagged gold in the Tokyo Paralympics 2021. Our ace shooter Avani Lekhara and Javelin Record Breaker Sumit Antil have created history for us. We are extremely proud of them. On a personal level, as a person with hearing disability I am very happy that my fellows are making it happen. Avani has become the first woman Indian athlete to bag the gold for India while Sumit broke his own records thrice in this tournament to bag his gold. They are getting recognized. And almost everyone was waiting for one man to react to these amazing athletes. Yes, you guessed it right. Mr. Anand Mahindra. 

    Only last week, Padmashree Deepa Malik who’s a paralympian herself and heads the Paralympic Committee of India, requested all automobile industry leaders from our country to research and make SUVs for people with disabilities like she is using in Tokyo. And as we all expected, Mr. Mahindra promptly put his crew on the task. Today he kind of reiterated his commitment along with a promise to give the first of its kind to our Golden Girl via his twitter handle. However, while replying to this tweet a guy sid correcting Mr. Mahindra’s use of the word “disabilities”. 

    It’s not about the label

    Sadly, part of the twitter thread is now all about the “correct” label for the community. If ‘disabilities’ is ok? Or we should call it ‘different abilities’. Some might even argue to call us people with ‘special abilities’. We Indians are so fascinated with our habit of labeling everything. Our honorable PM has coined a new label for us, Divyang. Personally, when I hear that word, I feel some mythological or mysterious limb has grown on my body. 

    Every language has a word for every disability. A person without eye sight is called blind person in English, आंधळा (Āndhaḷā) in marathi and so on. In a lame attempt to feel compassionate, sympathetic for us, people started creating such odd labels. 

    However, these specific terms are adjectives. They describe a PERSON with particular disability. While addressing one should not forget that you are talking about a person. Your focus should be a person and not a disability. Many forums and organizations, like United Nations have issued guidelines about inclusive language. They all prescribe to identify someone with disability as a person with disability and not to use the terms “handicapped,” “differently-abled,” “unfortunate,” or “special needs.”

    We, the people with disabilities

    We only need recognition and acceptance as fellow human from you and not your sympathy. Our disability is a condition which we have accepted and we are leading our lives happily. And as rightly proven by Avani and Sumit, hell yeah we are successful like every other person. So, let’s just call a spade a spade for once and accept us as we are. Once again, Congratulations to our champions and excitedly looking forward to engineering mastery of Mahindra and Mahindra.


    Read more such articles here.

  • सुषमा स्वराज: एक मायाळू करारी दीपस्तंभ

    सुषमा स्वराज: एक मायाळू करारी दीपस्तंभ

    देशाच्या संसदेत ऐतिहासिक निर्णय घेतले जात असतांना देशाच्या असामान्य भूतपूर्व परराष्ट्रमंत्री अचानक अशी exit घेतील याची पुसटशी शंकादेखील कधी मनात आली नसती. ६ ऑगस्ट च्या संध्याकाळी “आयुष्यात याच दिवसाची वाट पाहत होते” असे उद्गार काढणाऱ्या सुषमा स्वराजजींना अखेरची चाहूल लागली होती का काय अशीही शंका मनात येते.

    आज ज्या भावना या बातमीनंतर मनात दाटून येत आहेत त्या भावना आजच्या जगात कोणत्या राजकीय नेत्यासाठी येतील असे मला व्यक्तीशः वाटत नाही. सुष्मजींची राजकीय कारकीर्द जवळून पहिली म्हणणेच काय पण गेल्या सरकारच्या काळात त्यांच्या परराष्ट्र मंत्रीपदाची कारकिर्दही खूप अभ्यासली असेही मी म्हणणे धडधडीत खोटे ठरेल . पण ज्या काही थोड्याफार वेळेला या महान स्त्रीच्या ओघवत्या वाणीचा आस्वाद घेतला त्यावेळी मन भरून आलं यात शंका नाही मग ती भाषा कोणतीही असो. हिंदी, इंग्रजी इतकेच काय, मध्यंतरी युट्युबवर त्यांचे एक संस्कृत बद्दलचे भाषणही ऐकले होते तेही तितकेच ओजस्वी होते. त्यांचे लोकसभेतील वाक्पटूत्व पाहतांना जाणवणारी मुद्देसूदता आणि आंतरराष्ट्रीय पातळीवर किंवा संयुक्त राष्ट्र संघात बोलतांना दिसून येणारी मुरब्बी मुत्सद्देगिरी खूप प्रेरक आणि आकर्षक होती. स्वच्छ पोशाख, कायम प्रसन्न हास्य असलेला चेहरा, यासह सुषमाजींचे दर्शन झाले की त्यांच्याभोवती कायम एक वलय असल्यासारखे वाटायचे. आजही त्यांच्या फोटोकडे पाहिलं की एक ममत्व जाणवत, वाटतं कधीही एक आश्वासक हात पुढे येईल. पण ते आश्वासक हास्य आता भारतीयांपासून दूर गेलं.

    आजवर इतक्या उशिरा रात्री मी कोणतीही पोस्ट कोणत्याही सोशल मीडियावर केलेली नाही पण आजच्या भावनांना वाट मोकळी करून देण्याशिवाय झोप लागणार नाही याची मला खात्री आहे. या दीपस्तंभाला दिशादर्शक म्हणून ठेवून ध्येयाकडे मार्गक्रमण करणे हीच त्यांना योग्य आदरांजली ठरेल….

  • हुतात्मा – संयुक्त महाराष्ट्र चळवळीची गाथा

    हुतात्मा – संयुक्त महाराष्ट्र चळवळीची गाथा

    220px-Hutatma_Chowk.jpg१ मे, जगभरात साजरा होतो तो कामगार दिवस म्हणून पण इथे महाराष्ट्रात या १ मे ला विशेष धार मिळाली ती १९६० मध्ये मुंबईसह महाराष्ट्र निर्माण झाला तेव्हा. माझा जन्म १९८८ सालचा त्यामुळे ना मी भारताच्या स्वतंत्राचा लढा पहिला ना संयुक्त महाराष्ट्र चळवळ अनुभवली. शालेय इतिहासातून सुद्धा स्वातंत्र्ययुद्धाची तुरळक माहिती मिळाली पण स्वातंत्र्योत्तर काळात भारत घडलेल्या घटना आमच्यापर्यंत दंतकथेसारख्याच येत राहिल्या. संयुक्त महाराष्ट्राच्या चळवळीशी संबंधित जी गोष्ट कानावर पडली ती शाहीर विठ्ठल उमप यांच्या आवाजातली अण्णाभाऊ साठे यांनी लिहिलेली मुंबईची छक्कड. पण तो काळ डोळ्यासमोर उभा केला तो या महाराष्ट्र दिनाला Zee5 वर प्रदर्शित झालेल्या हुतात्मा या वेबसिरीजमधून. आता ZEE5 वर हुतात्मा ऑनलाइन पहा

    १९५६ च्या भाषावार प्रांतरचनेत ‘बॉम्बे स्टेट’ हे गुजराथी आणि मराठी भाषिकांचे द्विभाषिक राज्य बनले आणि विदर्भ आणि मराठवाडा हे मराठी भाषिकांचे भाग मराठी राज्यापासून वेगळे राहिले. या अन्यायाचा परिपाक म्हणून उभी राहिली ती संयुक्त महाराष्ट्र चळवळ. जिच्या नेतृत्वाची धुरा केशवराव जेधे, प्र. के. अत्रे, प्रबोधनकार ठाकरे, सेनापती बापट, कॉम्रेड डांगे, एस. एम. जोशी, शाहीर अमर शेख यांच्यासारख्या अनेक तालेवार मंडळींनी सांभाळली. शाहीर अमर शेख आणि अण्णाभाऊ साठे यांच्या दमदार पोवाडे, लावण्या आणि इतर लोकगीतांनी या चळवळीची नाळ लोकांशी जोडली गेली.

    54513714_2246019115454915_1465764964554916429_n

    हुतात्मा हि वेबसिरीज आपल्यासमोर उलगडते तीच मुळी १९५६ साली फ्लोरा फाउंटनवर झालेल्या नरसंहाराच्या दृश्यांनी. संयुक्त महाराष्ट्रासाठीच्या घोषणांच्या नादात चाललेल्या शांततापूर्ण मोर्च्यावर केलेल्या लाठीमार आणि अश्रुधुराच्या माऱ्यानंतर उसळलेल्या गोंधळाला आळा घालायला मोरारजी देसाईंनी गोळीबाराचा आदेश दिला आणि १०६ जणांनी हौतात्म्य पत्करले. याच गोळीबारात जीव गमावलेल्या गिरणी कामगाराच्या मुलीच्या ‘विद्युलता सावंत म्हणजेच विद्युतच्या भोवती ही सारी कथा गुंफली आहे.

    त्या काळात महाराष्ट्रात असलेल्या वेगवेगळ्या राजकीय प्रवाहांची अत्यंत योग्य अशी सांगड या वेबसिरीज मध्ये घातलेली दिसून येते. काँग्रेस, कम्युनिस्ट चळवळ, संयुक्त महाराष्ट्र समिती या साऱ्यांच्या राजकीय पटावर घडणाऱ्या घडामोडींचा मुंबईच्या स्थानिक मराठी माणसाच्या जीवनात काय प्रभाव पडत होता, तरुण मन वेगवेगळ्या विचारधारांकडे कोणत्या पद्धतीने आकृष्ट होत होते हे सारं काही मी आत्तापर्यंत पाहिलेल्या पहिल्या दोन भागातच इतकं समर्पक रीत्या मांडले गेले आहे की मला पुढचे भाग कधी एकदा पाहीन असे झाले आहे.

    सचिन खेडेकर, डॉ. मोहन आगाशे, विक्रम गोखले, जयंत सावरकर, रवींद्र मंकणी, लोकेश गुप्ते, आनंद इंगळे असली जबरदस्त उमदी फळी घेऊन रिंगणात उतरलेल्या या वेबसिरीज मध्ये नायिकेचं काम करणारी अंजली पाटील, पहिल्या दोन भागात भाव खाणारे काम करणारा वैभव तत्ववादी आणि अभय महाजन तितक्याच ताकदीने उभे आहेत. अभय महाजनचे ‘श्रीरंग पत्की’ या वार्ताहराचे पात्रसुद्धा अगदी योग्य वठले आहे. बातमीदाराने दिलेल्या बातमीवर आपल्या लेखणीने “ध चा मा” करण्याची ताकद ठेवणाऱ्या संपादकाच्या हाताखाली कराव्या लागणाऱ्या कामाबद्दलची खंत छान उठून येते.

    या शिवाय मला अगदी प्रकर्षाने जाणवलेली गोष्ट म्हणजे संवादांच्या भाषेचा आणि पात्रांच्या पार्श्वभूमीनुसार केल्या गेलेल्या वेगवेगळ्या बोलींचा वापर. भीमाबाई नाईकांच्या भूमिकेत छाया कदमांनी वापरलेली कोकणी मराठी एक चरचरीत फोडणी देऊन जाते. किरकोळच हिंदी संवाद असलेल्या पात्रांच्या तोंडच हिंदी सुद्धा मस्त जमून आलं आहे. मालिकेचा कपडेपट सांभाळणाऱ्या पोर्णिमा ओक यांनी एकदम चोख काम करत १९५६ साल प्रेक्षकांसमोर उभे केले आहे. पण या साऱ्यांच्या चार पाऊले पुढे राहून पहिल्यांदा हे सारं काही मनाच्या पडद्यावर निर्माण करून मग आपल्यासाठी चित्रीकरण करून घेणाऱ्या जयप्रद देसाई यांच करावं तितकं कौतुक कमीच होईल. ऐतिहासिक कथानकाला हात घालतांना कित्येक गोष्टींचा दहादा विचार करावा लागतो हे काही चित्रपटांना आपल्या आजूबाजूला घडणाऱ्या विरोधावरून आपल्या लक्षात येतेच. पण जयप्रद देसाई यांच्या दिग्दर्शनाखाली ‘हुतात्मा’ अगदी उत्तम बनली आहे. उरलेले भाग बघण्याची उत्सुकता टिकवून ठेवण्याच्या जागांवर प्रत्येक भाग संपतो आहे. त्यामुळे लवकरच पुन्हा नवीन काय पहायचे हा प्रश्न प्रेक्षकांना पडण्याची शक्यता नाकारता येत नाही.

  • गणेशोत्सव: उत्सव उत्साहाचा आणि पर्यावरणपुराकतेचा

    maxresdefault

    जसजसा श्रावण संपू लागतो तसतसा मराठी मनात उत्साह वाढू लागतो, महाराष्ट्राचा अत्यंत लाडका उत्सव लगेचच सुरु होणार असतो. बाजारपेठा सजू लागतात, गावोगावी लगबग सुरु होते आणि गणरायाच्या स्वागताला महाराष्ट्र सज्ज होऊ लागतो. पण पुण्यात हा उत्साह अजूनच दांडगा असतो. पुण्यातल्या गणेशोत्सवाचे स्वरूप, त्याची भव्यता आणि लगबग काही औरच असते. ती अनुभवण्यासाठी तुम्हाला पुण्यातच यायला हवं. सार्वजनिक गणेशोत्सवाचा उत्साह फार दांडगा असतोच पण घरगुती वातावरणातही अतिशय मन लावून गणरायाची आराधना या काळात पुण्यात होते. तशी या पुण्यातील घरगुती उत्सवाला परंपरा पेशव्यांपासून आहे. पेशवे त्यांच्या खाजगी कौटुंबिक गणरायाच उत्सव मोठ्या धुमधडाक्यात साजरा करीत असत.

    पण भाऊ रंगारी यांनी पुण्यात १२५ वर्षांपूर्वी या उत्सवाला सार्वजनिक स्वरूप दिले आणि १८९२ साली पुण्यात पहिला सार्वजनिक गणेशोत्सव साजरा झाला. लोकमान्य टिळकांनी पुढे १८९४ पासून याचे स्वरूप -आणिकच व्यापक केले आणि पुढे सारा महाराष्ट्र ह्या परंपरेत सहभागी झाला. आज पुण्यातलं या उस्तावाचे स्वरूप अगदी भव्य दिव्य आहे. पण याच भव्यतेमध्ये पर्यावरणाचा समतोल राखण्यासाठीही प्रयत्नशील असलेल्या पुणेकरांना २०१७ पासून व्होडाफोन इको-पाँड या आपल्या उपक्रमातून हातभार लावत आहेत. पुण्याच्या सार्वजनिक गणेशोत्सव परंपरेत, शंभर वर्षांहून जुन्या कसबापेठ, तांबडी जोगेश्वरी, गुरुजी तालिम, तुळशीबाग व केसरीवाडा या ५ गणरायांना आजही मानाचे स्थान आहे.

    पुण्यात घरगुती उत्सवात दीड दिवस, ५ दिवस किंवा गौरीबरोबर गणरायाचे विसर्जन करण्याचीही परंपरा आहे. पण त्याच बरोबर अनंतचतुर्दशीला होणारे विसर्जन देखील कित्येक कुटुंबांत परंपरेने चालत आले आहे. कित्येक सोसायट्यांमध्ये देखील हा उत्सव साजरा केला जातो. विविध वयोगटातील रहिवाश्यांसाठी वेगवेगळ्या स्पर्धा, मनोरंजनाचे कार्यक्रम केले जाता. दहा दिवस अत्यंत उत्साहाचे वातावरण असते. आणि क्षण येतो तो बाप्पांना निरोप देण्याचा. गेल्या काही वर्षात आपल्या सवयींमुळे आपण पर्यावरण पुराकतेकडून पर्यावरण ह्रासाकडे वाटचाल करतो आहोत. सुदैवाने आता महाराष्ट्रात थर्माकोलवर बंदी असल्याने हा एक अपायकारक वापर कमी झाला आहे. पण प्लास्टर ऑफ पॅरिसच्या मूर्तींचे नदीत, विहिरीत व इतर पाणवठ्यांवर होणारे विसर्जन चिंताजनक आहे. यावर उपाय म्हणून व्होडाफोन आयडिया कंपनी, पुणे महानगरपालिका आणि राष्ट्रीय रासायनिक प्रयोगशाळेच्या सहयोगाने “व्होडाफोन इको-पाँड” ही योजना सलग दुसऱ्या वर्षीही राबवते आहे.

    This slideshow requires JavaScript.

    २०१७ साली याच योजनेअंतर्गत “व्होडाफोन इको-पाँड” मध्ये विसर्जित केलेल्या ३१०० मूर्तींपासून १३ टन प्लास्टर ऑफ पॅरिसवर पुनर्प्रक्रिया केली आणि एक लाख लिटर इतके खत निर्माण केले. हे खत महाराष्ट्रातील शेतकऱ्यांना वाटण्यात आले. याही वर्षी पुणे शहरात ७ ठिकाणी हे पुणे शहरात एनआयबीएम, वाकडेवाडी, औंध, खराडी, बाणेर, कल्याणीनगर व चिंचवड लिंक रस्ता येथील व्होडाफोन दुकानांपाशी हे “व्होडाफोन इको-पाँड” उभारले आहेत. यामध्ये आपल्या घरगुती गणरायाचे विसर्जन पारंपारिक पद्धतीत साजरे करता येईल आणि शिवाय यातून पर्यावरणाला अजिबात धोका निर्माण होणार नाही. या ७ “व्होडाफोन इको-पाँड” शिवाय ४ फिरते इको-पाँड देखील वेगवेगळ्या गृहनिर्माण सोसायट्यांच्या आवारात नागरिकांसाठी उपलब्ध करून देण्यात आले आहेत. हे “व्होडाफोन इको-पाँड” नक्की कोठे आहेत ते तुम्हाला या सोबतच्या नकाशावर कळेलच पण अजूनही काही शंका असेल तर तुम्हाला ७३९१०००००० या क्रमांकावर फोन करून अधिक माहिती मिळवता येईल.

    Approved Ecopond infographic (2).jpeg

    तेव्हा या वर्षी गेल्यावर्षीपेक्षा जास्त प्रमाणात या “व्होडाफोन इको-पाँड”मध्ये आपल्या घरच्या गणरायाचे विसर्जन करून आपण पुणेकर पर्यावरणाला हातभार लावूया. शिवाय निर्माल्याचेही उत्तम दर्जाचे कंपोस्ट खत होऊ शकते. त्याही मार्गाचा अवलंब करून पुन्हा निसर्गाने दिलेलं त्याला परत करण्यात काहीच गैर नाही. पुणेकरांनी १२५ वर्षापूर्वी जशी एक परंपरा महाराष्ट्राला दिली तशीच आणखीन एक काळाची गरज असलेली हि पर्यावरणपूरक परंपरा महाराष्ट्राला देण्याची संधी पुण्याला आहे. पुणेकरांनी ती आजीबात सोडू नये आणि अर्थातच विसर्जन करतांना म्हणयला विसरू नका… “गणपती बाप्पा मोरया, पुढच्या वर्षी लवकर या.”