Category: कविता

  • विरहिणी…

    झड पावसाची लागे,
    सृष्टी आनंदाने भिजे.


    सख्या तुझ्या विरहात,
    तरी मन माझे भाजे.

  • पार्टीची स्मारके……….

    बनवली आम्हीही स्मारके लाखो पहा,

    आजची त्या स्मारकांची अवस्था ती पहा..


    मुखी असती घोषणा त्यांच्या जयाच्या,

    मनी योजना स्माराकीच्या पार्टीच्या.

  • विकतचं दुःख …..

    त्या दिवशी मला सुट्टीच होती,
    सकाळ तेव्हाची मजेत जात होती.

    हळू हळू सगळी आन्हिकं उरकली,
    मग हातात पेपारांची गाठ्ठी घेतली.

    सवयीने शेवटचा क्रीडा पान उघडलं.
    पराभवाच्या बातम्यांनी मन उदासल.

    पहिल्या पानांवर कधी जायचाच नसतं,
    खून दरोडे आणि लुटीशिवाय तिथे काहीच नसतं.

    उदास मनानी मग टी व्ही कडे वळलो,
    अहो पण टी व्ही लावून भलताच पस्तावलो.

    कोणत्याच सीरिअलचे एकही पत्र धड नाही,
    नैतिकतेची कुणाला चाडच उरली नाही.

    न्यूज च्यानल पण यातून सुटले नाहीत,
    अमिताभच्या तापाशिवाय ब्रेकिंग न्यूज नाही.

    ही साधनं आता कामाची उरली नाहीत,
    दुःख दैन्न्याशिवाय काहीच विकत नाहीत.

    पण लोकांनाही आता दुसरं काहीच सुचत नाही,
    विकतच्या या दुःखाशिवाय चैनच पडत नाही….

  • विरह सर

    सर पावसाची लागे, मन विरहात बुडे….
    बघ आला हा श्रावण, कुठे दिसे ना साजण…

    वाटी डोळे हे लावून, सारे दिन हे सरले..
    विरहाच्या सोबतीत, ह्या रात्रीही सरल्या….

    विसरला का रे, तू वाट या घरची…
    नको वाट तू बघू रे श्रावण सारण्याची…

  • मनाचा प्रवास….

    वाहत जात मन विचारांच्या प्रवाहात…
    हळूच कधी मागे येतं प्रवाहाच्या विरोधात…
    गुंतत बुडत विचारात, जात राहतं दूरवर …
    मधेच हात मारून मागे येतं जेव्हा येतं भानावर…

  • हवंय काय या मनाला????

    खरच कळत नाही मला हवंय काय या मनाला…..
    क्षणात खोल सागरी तर क्षणात गवसणी गगनाला..

    पंख पसरून उडतंय कधी उंच उंच आभाळी…
    कधी कटलेल्या पतंगाबरोबर खाते गटांगळी….

    असते कधी शूर वीर बाजीराव रणीचा….
    तर कधी बनते दासही कोण्या दासाचा….

    काय हवाय ते कळतंय का मनाचा तरी मनाला..
    का विचारताय ते उगीच आपला याला त्याला????