या वैशाख वणव्याची
नाही सोसत काहिली
काळ्या मेघांच्या छायेची
वाट साऱ्यांनी पाहिली.
वाट पाहून पाहून
पाणी डोळ्यांचे आटले.
निसर्गाचे चिडले मन
तेव्हा कुठे ते द्रवले.
या वैशाख वणव्याची
नाही सोसत काहिली
काळ्या मेघांच्या छायेची
वाट साऱ्यांनी पाहिली.
वाट पाहून पाहून
पाणी डोळ्यांचे आटले.
निसर्गाचे चिडले मन
तेव्हा कुठे ते द्रवले.
खायी है जख्म गहेरी,
भरा नहीं है घाव अभी.
चेहेरेसे नकाब हसिका,
फिरभी नहीं उतरा कभी.
चलते रहे बरसातोमे,
आसुओंको छुपाते हुए.
ना दिखे कभी वो किसीको,
दिलमे यही तमन्ना लिए….
शब्दांची ती धार कधीही
चालवणाऱ्या कळतच नाही
झेलाणाऱ्याच्या हृदयावारल्या
जखमा त्याला दिसत नाही.
जखमेवरती फुंकर सोडा,
पुनःपुन्हा ते वारच होती.
नाजुकशा वेड्या मनाची,
क्षणात एका शकले होती.
विखुरलेली ती शकले सारी,
गोळा करता नवीन घाव.
कसे तुला रे कळतच नाही,
झेलू कुठे हे नवीन घाव.
एकदा झाला चमत्कार
स्वप्नात आले चोर चार
म्हटले काढून मोठ्ठा सुरा
असेल ते सारे देऊन टाक पोरा
घाबरत त्यांना मी आत गेलो
थांबा, असेल ते घेऊन आलो
पळत पळत आत गेलो
रद्दीची पिशवी घेऊन आलो.
रद्दी बघून ते जास्तच चिडले
मारायला मला पटकन धावले
म्हणालो, काका जरा थांबा
काय म्हणतो, ते तरी ऐका
उशिरा येऊन बघा केला घोटाळा
सारं लुटून गब्बर आत्ताच गेला.
जमला तर एक काम करा
रद्दी तेवढी विकून टाका
आईला रद्दी दिसली जरी
राग येईल तिला भारी
मला आई खूपच ओरडेल
तुम्हाला तर चोपुनच काढेल
मार खायची असेल तयारी
येईलच थांबा तिची स्वारी.
चोप म्हणताच ते भ्याले फार
पळून गेले चारच्या चार….
कधीही कळले नाहीत तुजला,
शब्दांमधले गर्भित भाव.
माझ्या हरेक श्वासामधूनी,
दडले आहे तुझेच नाव.
आयुष्याच्या वाटेवर चालताना
कुठलंसं वळण येतं
मागचं सारं मागे सोडत
नवीन जग समोर येतं….