Author: Adi Sathe

  • चलनी नोटेस…

    चलनी नोटेस…

    सये तुझ्याविण चालत नाही संसाराचे गाडे,
    तू नसतांना आमुचे सारे काम आज हे अडे.

    पाच दहा ते दोनहजारी, ल्याली सारी रूपे,
    कधी शंभरी सोबत घेऊन काम करी तू पुरे.

    वजन ठेवता कामावर तू, पाय त्यास हो फुटे,
    वजन वाढता अवजड होते, आम्हा उगीच वाटे.

    हात बदलशी सारखेच तू, शांत कधी ना बसे,
    नसता जवळी कधी कुणाच्या, त्याचे होई हसे.

    येई सत्ता, थोडी मत्ता, साथ तुझी जर असे,
    झिंग तुझी जर जादा होता, विवेके गेला दिसे.

    नतमस्तक मी होतो सखये, बघूनी लीला साऱ्या,
    या जगतावर तुझीच चाले, एकछत्री ही माया.

  • हुतात्मा – संयुक्त महाराष्ट्र चळवळीची गाथा

    हुतात्मा – संयुक्त महाराष्ट्र चळवळीची गाथा

    220px-Hutatma_Chowk.jpg१ मे, जगभरात साजरा होतो तो कामगार दिवस म्हणून पण इथे महाराष्ट्रात या १ मे ला विशेष धार मिळाली ती १९६० मध्ये मुंबईसह महाराष्ट्र निर्माण झाला तेव्हा. माझा जन्म १९८८ सालचा त्यामुळे ना मी भारताच्या स्वतंत्राचा लढा पहिला ना संयुक्त महाराष्ट्र चळवळ अनुभवली. शालेय इतिहासातून सुद्धा स्वातंत्र्ययुद्धाची तुरळक माहिती मिळाली पण स्वातंत्र्योत्तर काळात भारत घडलेल्या घटना आमच्यापर्यंत दंतकथेसारख्याच येत राहिल्या. संयुक्त महाराष्ट्राच्या चळवळीशी संबंधित जी गोष्ट कानावर पडली ती शाहीर विठ्ठल उमप यांच्या आवाजातली अण्णाभाऊ साठे यांनी लिहिलेली मुंबईची छक्कड. पण तो काळ डोळ्यासमोर उभा केला तो या महाराष्ट्र दिनाला Zee5 वर प्रदर्शित झालेल्या हुतात्मा या वेबसिरीजमधून. आता ZEE5 वर हुतात्मा ऑनलाइन पहा

    १९५६ च्या भाषावार प्रांतरचनेत ‘बॉम्बे स्टेट’ हे गुजराथी आणि मराठी भाषिकांचे द्विभाषिक राज्य बनले आणि विदर्भ आणि मराठवाडा हे मराठी भाषिकांचे भाग मराठी राज्यापासून वेगळे राहिले. या अन्यायाचा परिपाक म्हणून उभी राहिली ती संयुक्त महाराष्ट्र चळवळ. जिच्या नेतृत्वाची धुरा केशवराव जेधे, प्र. के. अत्रे, प्रबोधनकार ठाकरे, सेनापती बापट, कॉम्रेड डांगे, एस. एम. जोशी, शाहीर अमर शेख यांच्यासारख्या अनेक तालेवार मंडळींनी सांभाळली. शाहीर अमर शेख आणि अण्णाभाऊ साठे यांच्या दमदार पोवाडे, लावण्या आणि इतर लोकगीतांनी या चळवळीची नाळ लोकांशी जोडली गेली.

    54513714_2246019115454915_1465764964554916429_n

    हुतात्मा हि वेबसिरीज आपल्यासमोर उलगडते तीच मुळी १९५६ साली फ्लोरा फाउंटनवर झालेल्या नरसंहाराच्या दृश्यांनी. संयुक्त महाराष्ट्रासाठीच्या घोषणांच्या नादात चाललेल्या शांततापूर्ण मोर्च्यावर केलेल्या लाठीमार आणि अश्रुधुराच्या माऱ्यानंतर उसळलेल्या गोंधळाला आळा घालायला मोरारजी देसाईंनी गोळीबाराचा आदेश दिला आणि १०६ जणांनी हौतात्म्य पत्करले. याच गोळीबारात जीव गमावलेल्या गिरणी कामगाराच्या मुलीच्या ‘विद्युलता सावंत म्हणजेच विद्युतच्या भोवती ही सारी कथा गुंफली आहे.

    त्या काळात महाराष्ट्रात असलेल्या वेगवेगळ्या राजकीय प्रवाहांची अत्यंत योग्य अशी सांगड या वेबसिरीज मध्ये घातलेली दिसून येते. काँग्रेस, कम्युनिस्ट चळवळ, संयुक्त महाराष्ट्र समिती या साऱ्यांच्या राजकीय पटावर घडणाऱ्या घडामोडींचा मुंबईच्या स्थानिक मराठी माणसाच्या जीवनात काय प्रभाव पडत होता, तरुण मन वेगवेगळ्या विचारधारांकडे कोणत्या पद्धतीने आकृष्ट होत होते हे सारं काही मी आत्तापर्यंत पाहिलेल्या पहिल्या दोन भागातच इतकं समर्पक रीत्या मांडले गेले आहे की मला पुढचे भाग कधी एकदा पाहीन असे झाले आहे.

    सचिन खेडेकर, डॉ. मोहन आगाशे, विक्रम गोखले, जयंत सावरकर, रवींद्र मंकणी, लोकेश गुप्ते, आनंद इंगळे असली जबरदस्त उमदी फळी घेऊन रिंगणात उतरलेल्या या वेबसिरीज मध्ये नायिकेचं काम करणारी अंजली पाटील, पहिल्या दोन भागात भाव खाणारे काम करणारा वैभव तत्ववादी आणि अभय महाजन तितक्याच ताकदीने उभे आहेत. अभय महाजनचे ‘श्रीरंग पत्की’ या वार्ताहराचे पात्रसुद्धा अगदी योग्य वठले आहे. बातमीदाराने दिलेल्या बातमीवर आपल्या लेखणीने “ध चा मा” करण्याची ताकद ठेवणाऱ्या संपादकाच्या हाताखाली कराव्या लागणाऱ्या कामाबद्दलची खंत छान उठून येते.

    या शिवाय मला अगदी प्रकर्षाने जाणवलेली गोष्ट म्हणजे संवादांच्या भाषेचा आणि पात्रांच्या पार्श्वभूमीनुसार केल्या गेलेल्या वेगवेगळ्या बोलींचा वापर. भीमाबाई नाईकांच्या भूमिकेत छाया कदमांनी वापरलेली कोकणी मराठी एक चरचरीत फोडणी देऊन जाते. किरकोळच हिंदी संवाद असलेल्या पात्रांच्या तोंडच हिंदी सुद्धा मस्त जमून आलं आहे. मालिकेचा कपडेपट सांभाळणाऱ्या पोर्णिमा ओक यांनी एकदम चोख काम करत १९५६ साल प्रेक्षकांसमोर उभे केले आहे. पण या साऱ्यांच्या चार पाऊले पुढे राहून पहिल्यांदा हे सारं काही मनाच्या पडद्यावर निर्माण करून मग आपल्यासाठी चित्रीकरण करून घेणाऱ्या जयप्रद देसाई यांच करावं तितकं कौतुक कमीच होईल. ऐतिहासिक कथानकाला हात घालतांना कित्येक गोष्टींचा दहादा विचार करावा लागतो हे काही चित्रपटांना आपल्या आजूबाजूला घडणाऱ्या विरोधावरून आपल्या लक्षात येतेच. पण जयप्रद देसाई यांच्या दिग्दर्शनाखाली ‘हुतात्मा’ अगदी उत्तम बनली आहे. उरलेले भाग बघण्याची उत्सुकता टिकवून ठेवण्याच्या जागांवर प्रत्येक भाग संपतो आहे. त्यामुळे लवकरच पुन्हा नवीन काय पहायचे हा प्रश्न प्रेक्षकांना पडण्याची शक्यता नाकारता येत नाही.

  • द्वंद

    द्वंद

    PicsArt_04-11-07.48.07.jpg

    एक अथक द्वंद्व सुरू आहे माझ्या मनात,
    अगदी अनादी काळापासून,
    हा संघर्ष आहे तुझ्या माझ्यातला,
    कळत नाहीये की तो आहे माझ्याशीच माझा.

    सतत दिसून येतं डावं ऊजवं,
    जणू बसलं आहे लावून स्वताच्याच पाठीला पाठ,
    संवाद तोडून कुढतं कधी मनातल्या मनात.
    कधी कधी जेव्हा डोळे उघडतात,
    तेव्हा विचारावंसं वाटतं,
    हेच द्वंद्व सुरू आहे का तुझ्याही मनात?



    English translation

    ~~~~~

    There’s a tussle in my mind,
    Continuing since eternity,
    Tussle’s between you and me,
    Or is it, me versus me?

    I witness right and left
    sitting back to back all the time,
    Looking inward, immersed in silence.
    But whenever I open my eyes,
    I always wanted to ask,
    Is the same tussle is troubling you?


    Painting artist Snehal Ekbote.

     

  • कुतूहल

    कुतूहल

    textgram_1552459480
    मनातल्या बागेला मायेचं कुंपण.
    बागेतल्या फुलाफळांची करायचं राखण
    कुणा ढोराचं भय नाही,
    ना कुणा चोराचं.
    कुतूहल नावाचं एक बारीक पिल्लू,
    बिनधास्त बागडायचं त्या बागेत.
    कुंपणाच्या बाहेर काय आहे बघायला उड्या मारायचं,
    धडपडायचं.
    कधी कुंपणावर आपटायचं, लागायचं,
    पण कुतुहलच ते, ते कधीच नाही थांबायचं.
    त्याला खुणावायचं ते जे कुंपणाबाहेर असायचं.
    दिसामागून दिस गेला, मासामागून मास,
    वर्षे सारत कुतुहलसुद्धा वाढले मोठेच खास,
    एक दिवशी जोर लावून मारली लांब उडी.
    बाग सोडून विश्वाच्या पोकळीत पडली उडी.
    तगमग, धडपड, बडबड, त्रागा, सारं काही झालं.
    पोकळीचा या ठाव घेणं हेच वेड लागलं.
    आठवत नाही,
    तेव्हापासून आजवर, किती सरली वर्ष
    कुतूहलाचा चालूच आहे आपला आपला संघर्ष…



    I have commented about human curiosity about unknown voids of this universe in this poem. The imagery I have used is of a secured garden from which human mind is trying to escape in to the unknowns of this world. Hope you will like it. If you enjoyed this poem and my recitation, please feel free to share, like comment and subscribe to my blog.

  • बटा

    बटा

    This quatrain is about the beauty of flowy hair of love interest.
    ~~~
    येती बटा भाळावरी
    लाटा जशा त्या सागरी
    खेचूनी मज ओढती
    नावेपरी त्या अंतरी
    ~~~
    हिंदी मतलब

    ये तेरी बिखरी लटे,
    जैसे सागर की लेहरे,
    खिच ले मुझे खुदमे,
    जैसे कश्ती छोटी कोई…
    ~~~

  • धागा – भावाबहिणीचे ग्रामीण मातीतले नाते उलगडणारा चित्रपट.

    धागा – भावाबहिणीचे ग्रामीण मातीतले नाते उलगडणारा चित्रपट.

    राखी, मग ती रेशमी असो, सोन्या-चांदीची असो, सुती असो की अगदी आजकाल येते तशी झगमग करणारी LED दिव्यांची असो; भावाबहिणीसाठी खूप पवित्र आणि ताकदवान बंधन आहे. धागा, ही ZEE5 ची फिल्म फिरते ती याच पवित्र बंधनावर. राज गुप्तांच्या दिग्दर्शनाखाली तयार झालीला हा चित्रपट साहिल केणे आणि अश्विनी लाडेकर यांच्या उत्तम अभिनयाने एका वेगळ्याच उंचीवर पोचतो. गोष्टीचा भर या नात्याच्या आजूबाजूने फिरत असला तरी या चित्रपटात घडणारं महाराष्ट्राच्या खेड्यातलं जीवन अत्यंत खुबीने दाखवण्यात यश आले आहे.

    4930286883_7be2623793_b

    शंकर आणि उमा या भावंडांच्या नात्याला धरून पुढे जाणारा हा चित्रपट मराठी ग्रामीण जीवनाच्या अनेक अंगांना अगदी सहजपणे स्पर्श करत जातो. चित्रपट सुरु होतो तोच अगदी मराठी मातीत रुजेलेल्या आणि तुम्हा आम्हाला आपल्या लहानपणात घेऊन जाईल अशा गोट्या खेळण्याच्या सीननी आणि तिथून आपण शंकरच्या मागे मागे फिरत हा सिनेमा बघतो. भावाबहिणीच नातं उमलत जातं पण त्याच बरोबर उमाच्या मनात रुजलेल्या प्रेमाचं दर्शनही या कथेत घडत जातं. या उलगडत जाणाऱ्या नात्यांच्या पार्श्वभूमीवर वाजणारं संगीत नक्कीच मराठी मातीत रुतलेलं आहे.

    रक्षाबंधनाच्या वेळेचं गाणं आणि त्या वेळेचं चित्रीकरण आपल्याला थेट ग्रामीण महाराष्ट्रात घेऊन जात. तिथलं छोट्या छोट्या सणांचं जे उत्साहाचं वातावरण असतं ते अगदी छोट्याशा सीन मधून अगदी छान दाखवल आहे. चित्रीकरणाची जबाबदारी समर्थपणे पेलणाऱ्या समीर दांडेकर चं कौतुक करावे तितके कमीच आहे. पण याच चित्रीकरणाला सुस्मित लिमये आपल्या पार्श्वसंगीताने एका वेगळ्या उंचीवर नेऊन ठेवतात.

    50121372_215464939396405_163418471662749537_n

    वास्तविक हे भावाबहिणीचं नातं काही आपल्या चित्रपटसृष्टीला नवीन नाही. श्रेयस तळपदे आणि श्वेता प्रसादचा “इक्बाल” तसच संजय सुरी आणि जुही चावलाचा “माय ब्रदर निखील” याच नात्याच्या काही वेगळ्या छटा आपल्यासमोर घेऊन येतात. अगदी इतकंच कशाला, चित्रपटाचा मुख्य विषय नसला तरी “जाने तू या जाने न” मधून दिसणारं जेनेलिया डिसुझा आणि प्रतिक बब्बर यांच्यातलं भावाबहिणीच नातं मनातल्या काही विशेष तारा छेडून जातं.

    अर्थात या नात्याचं महत्व म्हणा, किंवा आकर्षण म्हणा काय केवळ आपल्यालाच आहे असे नाही. आपल्याकडे जरी याला रक्षाबंधन आणि भाऊबीज असं धार्मिक महत्व असलं तरीसुद्धा साऱ्या जगाला या नात्यातलं प्रेम तितकंच प्रेमळ आणि महत्वाच वाटतं. असेच भावंडांच्या नातेसंबंधांचे वेगवेगळे पैलू अनेक इंग्रजी चित्रपटांमधून पण हाताळले गेले आहेतच. Her Name Is Sabine असेल, किंवा २००९ चा My Sister’s Keeper असेल, यातून सुद्धा भावंडांमधलं एक वेगळे नाते उलगडायचा प्रयत्न या चित्रपटाच्या माध्यमातून केलं गेला. अजूनही काही चित्रपट आहेत त्याबद्दल आपल्याला या पेजवर माहिती मिळू शकेल.

    पण या साऱ्या सिनेमांपेक्षा धागा या नातेसंबंधाचा एक वेगळा पदर घेऊन आपल्यासमोर येतो. ग्रामीण महाराष्ट्रातील जनमानसावर असलेला रूढी, परंपरा यांचा पगडा किती घट्ट आहे याचाही संदर्भ या चित्रपटात अत्यंत खुबीने गोवला आहे. याबद्दल याचे कथा पटकथा लेखक शाद्वल यांचे विशेष आभार मानायला हवेत. आणि त्याच बरोबर मराठी भाषेचा खास ग्रामीण लहेजा पकडण्याचे काम संवाद लेखकांच्या टीमने अगदी चोख बजावले आहे. त्यामुळे कुठेही चित्रपटाची पकड प्रेक्षकांवरून सुटत नाही. डॉ. भाग्यश्री चिटणीसांनी साकारलेली आई तशी पडद्यावर अगदी दोन तीन शॉटपुरतीच आहे पण आई म्हणजे वात्सल्य हे ठसवून गेली आहे. शंकरची मित्रमंडळी आणि उमाचा मित्र सुद्धा आपल्याला अगदी सहज आपल्या आजूबाजूला सापडतील यात शंका नाही.

    उमाच्या मनात रुजलेल्या प्रेमाचं काय होतं? वडिलांनी राखी पौर्णिमेच्या दिवशी सांगितल्याप्रमाणे शंकर आपल्या बहिणीची काळजी घेतो का? तिच्या पाठीशी उभा राहतो का? या साऱ्या प्रश्नांना या चित्रपटात अगदी छान आटोपशीर पद्धतीने हाताळले आहे. पण हा चित्रपट पाहिल्यानंतर माझ्या मनात काही प्रश्नांनी घर करणे सुरु केले आहे. त्याबद्दल पुन्हा कधीतरी…