विकतचं दुःख …..

त्या दिवशी मला सुट्टीच होती,
सकाळ तेव्हाची मजेत जात होती.

हळू हळू सगळी आन्हिकं उरकली,
मग हातात पेपारांची गाठ्ठी घेतली.

सवयीने शेवटचा क्रीडा पान उघडलं.
पराभवाच्या बातम्यांनी मन उदासल.

पहिल्या पानांवर कधी जायचाच नसतं,
खून दरोडे आणि लुटीशिवाय तिथे काहीच नसतं.

उदास मनानी मग टी व्ही कडे वळलो,
अहो पण टी व्ही लावून भलताच पस्तावलो.

कोणत्याच सीरिअलचे एकही पत्र धड नाही,
नैतिकतेची कुणाला चाडच उरली नाही.

न्यूज च्यानल पण यातून सुटले नाहीत,
अमिताभच्या तापाशिवाय ब्रेकिंग न्यूज नाही.

ही साधनं आता कामाची उरली नाहीत,
दुःख दैन्न्याशिवाय काहीच विकत नाहीत.

पण लोकांनाही आता दुसरं काहीच सुचत नाही,
विकतच्या या दुःखाशिवाय चैनच पडत नाही….

7 thoughts on “विकतचं दुःख …..

  1. are ekach number ahe…….aaj kal je ghadat ahe te agdi surekh tipla ahes…………………mast …………….superb creativity

  2. MEDIA…ani tyanchi bhankasgiri…kharay re sagla kharay..pan kasay na paper vachalyashivay karamat nahi ani thoda tari tv pahilyashivay chain padat nahi…aso…chalayachach…

Leave a Reply

%d bloggers like this: