जसजसा श्रावण संपू लागतो तसतसा मराठी मनात उत्साह वाढू लागतो, महाराष्ट्राचा अत्यंत लाडका उत्सव लगेचच सुरु होणार असतो. बाजारपेठा सजू लागतात, गावोगावी लगबग सुरु होते आणि गणरायाच्या स्वागताला महाराष्ट्र सज्ज होऊ लागतो. पण पुण्यात हा उत्साह अजूनच दांडगा असतो. पुण्यातल्या गणेशोत्सवाचे स्वरूप, त्याची भव्यता आणि लगबग काही औरच असते. ती अनुभवण्यासाठी तुम्हाला पुण्यातच यायला हवं. सार्वजनिक गणेशोत्सवाचा उत्साह फार दांडगा असतोच पण घरगुती वातावरणातही अतिशय मन लावून गणरायाची आराधना या काळात पुण्यात होते. तशी या पुण्यातील घरगुती उत्सवाला परंपरा पेशव्यांपासून आहे. पेशवे त्यांच्या खाजगी कौटुंबिक गणरायाच उत्सव मोठ्या धुमधडाक्यात साजरा करीत असत.
पण भाऊ रंगारी यांनी पुण्यात १२५ वर्षांपूर्वी या उत्सवाला सार्वजनिक स्वरूप दिले आणि १८९२ साली पुण्यात पहिला सार्वजनिक गणेशोत्सव साजरा झाला. लोकमान्य टिळकांनी पुढे १८९४ पासून याचे स्वरूप -आणिकच व्यापक केले आणि पुढे सारा महाराष्ट्र ह्या परंपरेत सहभागी झाला. आज पुण्यातलं या उस्तावाचे स्वरूप अगदी भव्य दिव्य आहे. पण याच भव्यतेमध्ये पर्यावरणाचा समतोल राखण्यासाठीही प्रयत्नशील असलेल्या पुणेकरांना २०१७ पासून व्होडाफोन इको-पाँड या आपल्या उपक्रमातून हातभार लावत आहेत. पुण्याच्या सार्वजनिक गणेशोत्सव परंपरेत, शंभर वर्षांहून जुन्या कसबापेठ, तांबडी जोगेश्वरी, गुरुजी तालिम, तुळशीबाग व केसरीवाडा या ५ गणरायांना आजही मानाचे स्थान आहे.
पुण्यात घरगुती उत्सवात दीड दिवस, ५ दिवस किंवा गौरीबरोबर गणरायाचे विसर्जन करण्याचीही परंपरा आहे. पण त्याच बरोबर अनंतचतुर्दशीला होणारे विसर्जन देखील कित्येक कुटुंबांत परंपरेने चालत आले आहे. कित्येक सोसायट्यांमध्ये देखील हा उत्सव साजरा केला जातो. विविध वयोगटातील रहिवाश्यांसाठी वेगवेगळ्या स्पर्धा, मनोरंजनाचे कार्यक्रम केले जाता. दहा दिवस अत्यंत उत्साहाचे वातावरण असते. आणि क्षण येतो तो बाप्पांना निरोप देण्याचा. गेल्या काही वर्षात आपल्या सवयींमुळे आपण पर्यावरण पुराकतेकडून पर्यावरण ह्रासाकडे वाटचाल करतो आहोत. सुदैवाने आता महाराष्ट्रात थर्माकोलवर बंदी असल्याने हा एक अपायकारक वापर कमी झाला आहे. पण प्लास्टर ऑफ पॅरिसच्या मूर्तींचे नदीत, विहिरीत व इतर पाणवठ्यांवर होणारे विसर्जन चिंताजनक आहे. यावर उपाय म्हणून व्होडाफोन आयडिया कंपनी, पुणे महानगरपालिका आणि राष्ट्रीय रासायनिक प्रयोगशाळेच्या सहयोगाने “व्होडाफोन इको-पाँड” ही योजना सलग दुसऱ्या वर्षीही राबवते आहे.
२०१७ साली याच योजनेअंतर्गत “व्होडाफोन इको-पाँड” मध्ये विसर्जित केलेल्या ३१०० मूर्तींपासून १३ टन प्लास्टर ऑफ पॅरिसवर पुनर्प्रक्रिया केली आणि एक लाख लिटर इतके खत निर्माण केले. हे खत महाराष्ट्रातील शेतकऱ्यांना वाटण्यात आले. याही वर्षी पुणे शहरात ७ ठिकाणी हे पुणे शहरात एनआयबीएम, वाकडेवाडी, औंध, खराडी, बाणेर, कल्याणीनगर व चिंचवड लिंक रस्ता येथील व्होडाफोन दुकानांपाशी हे “व्होडाफोन इको-पाँड” उभारले आहेत. यामध्ये आपल्या घरगुती गणरायाचे विसर्जन पारंपारिक पद्धतीत साजरे करता येईल आणि शिवाय यातून पर्यावरणाला अजिबात धोका निर्माण होणार नाही. या ७ “व्होडाफोन इको-पाँड” शिवाय ४ फिरते इको-पाँड देखील वेगवेगळ्या गृहनिर्माण सोसायट्यांच्या आवारात नागरिकांसाठी उपलब्ध करून देण्यात आले आहेत. हे “व्होडाफोन इको-पाँड” नक्की कोठे आहेत ते तुम्हाला या सोबतच्या नकाशावर कळेलच पण अजूनही काही शंका असेल तर तुम्हाला ७३९१०००००० या क्रमांकावर फोन करून अधिक माहिती मिळवता येईल.
तेव्हा या वर्षी गेल्यावर्षीपेक्षा जास्त प्रमाणात या “व्होडाफोन इको-पाँड”मध्ये आपल्या घरच्या गणरायाचे विसर्जन करून आपण पुणेकर पर्यावरणाला हातभार लावूया. शिवाय निर्माल्याचेही उत्तम दर्जाचे कंपोस्ट खत होऊ शकते. त्याही मार्गाचा अवलंब करून पुन्हा निसर्गाने दिलेलं त्याला परत करण्यात काहीच गैर नाही. पुणेकरांनी १२५ वर्षापूर्वी जशी एक परंपरा महाराष्ट्राला दिली तशीच आणखीन एक काळाची गरज असलेली हि पर्यावरणपूरक परंपरा महाराष्ट्राला देण्याची संधी पुण्याला आहे. पुणेकरांनी ती आजीबात सोडू नये आणि अर्थातच विसर्जन करतांना म्हणयला विसरू नका… “गणपती बाप्पा मोरया, पुढच्या वर्षी लवकर या.”
Leave a Reply