Category: ललित

  • कैफियत

    मित्रांनो नमस्कार,, आज मी काही तुमच्याशी गप्पा मारणार नाहीये. आपल्यावर हे बारीक नजर ठेऊन असलेले हे मोट्ठे लोक आहेत नं.. हो हो तुम्हीच, या असे समोर येऊन बसता का?? तुमच्याशीच बोलायचं थोडं. मित्रांनो तुम्ही असे माझ्या बाजूला येऊन बसा. म्हणजे कसे व्यवस्थित २ गट होतील ना. तर मी म्हणत होतो कि मी तुमच्याशी गप्पा मारणार नाहीये. तर आज मी मांडणारे एक कैफियत. आपल्या सगळ्यांच्या वतीनी या मोठ्यांसमोर. काय म्हणताय कैफियत कसची ना? सांगतो कि… आपले आमच्या वागण्या बोलण्यावर काही आक्षेप आहेत, जे साहजिकच आम्हाला मान्य नाहीत, त्या बद्दल…. आमची हि कैफियत ऐकून घेऊन त्यावर काही तोडगा निघेल अशी अपेक्षा आहे आणि तशी अशा वाटते म्हणून मांडतो आहे तुमच्यासमोर..

    सगळ्यात मोठ्ठा आरोप तुम्ही लोकं करता तो म्हणजे आमची सर्जनशीलताच संपली आहे.. हि गोष्ट तर अजिबात मान्य नाही आम्हाला. आमची सृजनाची क्षेत्रच जर वेगळी असतील आणि ती तुम्हाला माहितीच नसतील तर सर्जनशीलता दिसेलच कशी?? आज दिवसाला एक या दरानी संगणकात बदल होत आहेत. नवनवीन डिजिटल उत्पादने बाजारात येत आहेत. अनेक सोयी सुविधा उपलब्ध होत आहेत. मोबाईलसारख्या उपकरणांमध्ये प्रचंड झपाट्यानी बदल होत आहेत, जे आपण सगळ्यांनी अंगिकारले आहेत. जग अगदी एका बटणाच्या दुरीवर आलं आहे. हि सगळी कुणाची तरी सर्जनशीलताच आहे नं???

    आज अनेक नवनवीन लेखक, कवी उदयाला येत आहेत, जुन्या पुस्तकाच्या अगदी नियमीतपणे आवृत्या निघत आहेत; तरी ओरड आहेच आम्ही काही वाचत नाही.. सारखं ऐकवतात “वाचाल तर वाचाल”. पण आजच्या घड्याळाच्या काट्यांवर पळण्याच्या दिवसात पुस्तकांचा रसास्वाद घ्यावा तरी कसा? त्यावर पण आम्ही उपाय शोधलाय नं. पुस्तकांची अभिवचन करून ती ध्वनिमुद्रित करून ठेवली आहेत. त्यांचा आस्वाद आम्ही घेत असतोच की. अशा डिजिटल पुस्तकांची ई-वाचनालये सुद्धा बनवलीत आम्ही.

    आमच्यावर अजून एक जाहीर आरोप होतो.. “तुम्ही दिवसभर नुसते या खोक्यांसमोर बसा आणि चष्म्यांचे नंबर वाढवा. कुठे बाहेर म्हणून जायला नको.” अहो आम्हाला पण फिरावासा वाटतं नं. आम्ही फिरतो सुद्धा. आणि जर फिरत नसतो तर वैनतेय, पगमार्क्स यांसारख्या ट्रेकिंगच्या आणि इतर अनेक पर्यटन संस्थांचे कारभार इतक्या सुरळीत आणि तेजीत चालेल असते??? कधीच बंद पडायला हव्या होत्यान ना..

    आमच्यातही काही दोष आहेत ना ते नाकारता येणारच नाहीत. तशी इच्छा पण नाहीये. नुकते कुठे ते कळायला लागलेत पण अजून वळले नाहीयेत. वळतीलही हळू हळू. अनेक प्रश्न, गंभीर समस्या थैमान घालताच आहेत की. खालावलेली नितीमत्ता, धर्मातील पंथांमधील तेढ, भ्रष्टाचार, पर्यावरणाचा ह्रास, हे सगळे कमी होते म्हणून राष्ट्रहितापेक्षा स्वहित मोठे मानून देश विक्रीसाठी बाजारात उभा केला गेला. सगळीकडे घाण झाली आहे. पण घरची साफसफाई करण्यात हात कोण खराब करून घेईल? सगळे आपले ग्रीन कार्डच्या मागे. डिग्री मिळाली की पळाले तिकडे. खोऱ्यानी मिळणारा पैसे दिसतो पण त्याच खोऱ्यानी तो तिथे खर्च पण करावा लागतो हे इथून दिसत नाही ना. तरी आपले सगळे पळतात तिकडे.

    इथेही काही कमी पैसा नाही हो. इथे पण बख्खळ मिळतो. मग आमचे डोळे थोडे निळसर हिरवट दिसु लागतात. पैश्यांचा रंग येतो ना त्यात. मग आपले आई वडील अचानक भंगार माल वाटू लागतात. मग त्यांची रवानगी होते वृद्धाश्रमात. विचार पण करत नाहीत की आज पैसे मिळवण्याइतकी जी काय आपली लायकी आहे ती यांच्यामुळेच. बिचारे आपले निमूटपणे स्वतःच्या कष्टानी उभं केलेलं घर सोडतात. वर्ष वर्ष साधी विचारपूस पण त्यांच्या वाट्याला येत नाही.

    नैतिकतेच्या नावानी तर बोंब झाली आहे. चित्रपट आणि दूरदर्शन मालिका तर अगदी बघवत नाहीत. अरे ते बालगंधर्व पुरुष असून कधी पदर ढळत नसे त्यांचा. आताच्या नट्यातर कधी आमचे कपडे फेडताय याचीच अगदी आतुरतेनी वाट बघत असतात जणू. आणि अंधानुकारणाचा जन्मसिद्ध हक्क बजावण्यासाठी तरुण मंडळी टपलेलीच असतात. ते तरी काय करणार त्यांना अंगभर चापूनचोपून साडी नेसलेली स्त्रीच आजकाल दिसत नाही ना कुठे.

    मान्य आहे आमच्यात मद्य संस्कृती वाढते आहे. त्याला सोसायटी स्टेटसचा सोनेरी मुलामा चढवला जातोय. सरकारचाही त्याला अनुदानांसकट भक्कम पाठबळ मिळतोय. पण जे वाइट त्याला चांगला कसं म्हणायचं? इतरही अनेक छोटे मोठे दोष आहेत आमच्या पिढीत. याचा अर्थ असा नाही की आम्ही अगदीच टाकाऊ आहोत.

    मित्रांनो आपली कैफियत मांडता मांडता मी त्यांच्याही कैफियतीचे काही काही मुद्दे मांडलेत. काय हो, बरोबर ना?? मग… आपण त्यांना वचन द्यायचं ना? दोष दूर करण्याच्या प्रामाणिक प्रयत्नांचं.. हा थोडं वेळ द्यावा लागेल. कष्ट पडतील थोडे.थोडं अवघड आहे. पण करणार ना? मग देऊ होकार??? माझा तर आहेच हो पण तुमच्याही होकाराची वाट बघतोय…

  • इस शहरमे हर शक्स परेशान सा क्यु है….


    नमस्कार मंडळी….

    पुन्हा एकदा आपल्या भेटीला मराठीतून येतोय.. आज कालजिकडे बघावा तिकडे नुसते उसासे आणि हताश निश्वास ऐकू यायला लागलेत.. जणू सगळीकडे कायम पराजय हाती लागतो आहे आणि दूर दूर पण कुठे विजयाचा साधा कवडसा तर सोडा पण छोटी तिरीप पण नाही दिसत आहे. सगळे आपले कायम चिंतेतच दिसतात. काय तर चेहेऱ्यावर भाव… सगळे स्वतःला समर्थ रामदासच समजतात… एकाच भाव.. “चिंता करितो विश्वाची”. अगदी बालवाडीतल्या मुला-मुलींपासून ते अगदी शंभरी गाठलेल्या आजी आजोबांपर्यंत सगळ्यांच्याच. बालवाडीतल्या छोट्याला चिंता शाळेत का जायचं याची. प्राथमिक शाळेतले एकाच चिंतेत; खेळायला मिळेल?? अभ्यास संपेल हि चिंता तर माध्यमिक शाळांमधल्या लोकांना खूप चालत असते. कॉलेजकुमार तर कायम आपल्या प्रेमाच्याबद्दल भयाण चिंतेत असतात. एकमेकांबरोबर असले तर काय करतात कोण जाणे?? पदवीधर बिचारे सदैव नोकरी मिळेल का याच्या विचारांनी हैराण. नोकरदार आणि व्यावसायिक आपले उद्योगधंद्यांच्या चिंतेत. गृहिणी घर कसा चालवावे याच्या विचारात पार डोक्याच्या वरपर्यंत बुडालेल्या. वान्प्रस्थींना वेगळीच चिंता; “सून आपल्याला ठेवून घेईन घरी कि देईल हाकलून घरातून”….. चिंता आणि चिंता…
    का सगळा आनंद हरवला आहे??? कोणी तरी हसायला शिकावा रे यांना.. पुन्हा एकदा या काळात आचार्य अत्रे आणि पु ल यावेत असा वाटायला लागलाय… कारण त्यांची पुस्तक कोणी वाचत नाहीत.. किमान ते आले आणि बोलले तर हसतील अशी धूसर शक्यता मला वाटते आहे.. तुम्हाला काय वाटतं???
  • Best time in life

    Hii friends, Once again I am here to share some good time of my life. Great time I spent. Some days before I was at the same place where I got my live; of coarse my life friends. But this time I was not alone. My love; my life was with me. We go there just to recollect the excitement and joy of that most memorable day of our life.
    There was lot of time for world to awake. None of signs of sunrise were within miles of that seashore. Sea was only the person who was daring to break the deep silence by hitting his waves. And we two were just calm and quiet. We were walking on the wet sand of sea shore leaving our small footprints over long seashore knowing that they have no future. Next wave is going to take them with her. Our hands came together and started their talks which were full of love. But still we were quiet and enjoying the wave sounds.
    Wind breeze which was trying to make us close at our first meeting; now was eager to separate us. Every now and then she was trying to pass through us like naughty little kitties. But unknowingly to breeze herself, she was putting us more closer. How? That also I should tell? Ok.. That dumb breeze forgot that she is chill. Her chills were sending shocks through our bodies and we were coming more closer on each shock.
    After long, long, long walk; I mean many to and fros on wet sand with great silence; we sat on same rock where I dared to propose her. Our hands were still together and having their lovely talks. Along with talking hands and silent we, one more couple gather there; my shoulder and her head. But they chose to remain silent like us.
    Both of us were watching the horizon and watching for other to break the ice. How many minutes passed by us; staring at us that we really don’t know. We were just feeling the beauty of masterpiece created by greatest artist in the world; the nature.
    Slowly colors started to change at horizon and new joy was started to flow through nature. And at the same instance we both came and broke the ice with exactly the same words. The most beautiful words in world; ” I love you.”
    As soon as she came to know that we caught same moment for same words; blush took over all the expressions on her face. Let me tell you friends; she look most beautiful whenever she blush. I just couldn’t control friends, I just couldn’t control myself and I kissed her on her forehead. After that both of us kept praising each other. And suddenly words came taking my voice; ” Love; you are my life. Don’t leave me; please never go away from me. Without you I will be like body without soul.” On this she replied only “Hmmmmmmm………”; with churning her nose on my chest and hugging me tightly.
    And again we headed to silence. Now there was only sound of sea waves hitting shore. They were making sound like our ancestors blessings us for our happy life saying “stay as you are whole life………..”
  • आठवांचे मोती……

    नमस्कार मित्रांनो..

    एक काम करा एक १९-२० वर्षाच्या तरुणाची खोली डोळ्यापुढे आणा. सोयीसाठी आपण त्याचं नाव बंड्या??? नको खूप जुनं वाटतं. सनी ठेऊ. चालेल?? साधारण काय चित्र डोळ्यापुढे उभं राहील??? एका बाजूला कॉट आहे, ज्यावर इतका पसारा आहे की गादी आहे की नाही हेच दिसत नाही. पसारा म्हणजे काय हो, २ – ४ cd ची कव्हर्स पडली आहे, एखाद दुसरी वही आणि पुस्तक, ५-६ कपडे, आणि तो स्वतः. इतक्या सगळ्या गोष्टी असल्या की मग कशी काय गादी सापडेल??? ही झाली कॉट. दुसरीकडे कधीही न अवरलेल कपाट. न अवरलेल म्हणजे जर उघडलं तर किमान ७-८ गोष्टी खाली आल्याच पाहिजेत. एका बाजूला अभ्यासासाठी म्हणून वडिलांनी कौतुकानी घेतलेलं टेबल. पण चिरंजीवांनी जणू तिथे कधीच अभ्यास न करण्याचा चंग बांधलेला असतो. त्यावर फक्त परीक्षे आधी २-३ दिवसच हात लावण्यासाठी घेतलेली वह्या पुस्तकं, मुलगा कॉमर्सचा असेल तर पुस्तकांची जागा शार्प्स घेतात इतकाच काय तो फरक. बाकी हात लावण्याचा काळ सारखाच. एका कोपऱ्यात क्रिकेटचं किंवा तत्सम कोणत्या खेळाचं समान पडलेलं. आणि हो एका स्पेशल टेबलवर मुलाचा लाडका मित्र…. संगणक… हे महाराज आपले दिवसभर त्याच्याशी हितगुज करण्यात मग्न होऊन बसलेले असतात.

     


    मित्रांनो ही सगळी रचना तुमच्या पुढे अशासाठी उभी केली की ती जर तुमच्या डोळ्यापुढे आली तर मी पुढे जे सांगणारे ते तुम्हाला छान एन्जॉय करता येईल. हा तर आपण मगाशी सगळी खोली डोळ्याखालून घातली. अशीच ती सनीच्या मातोश्रींनी पण घातली. आणि सनीचा कान धरून सांगितला की आजच्या आज जर ही खोली आवरली नाहीस न तर जेवायला देणार नाही. तर बच्चमजी म्हणाले… चालेल आई मी बाहेर जाईन… त्यावर बिचाऱ्या आईसाहेब काय करणार??? मुकाट्याने दाराबाहेर गेल्या.. आणि बेट्याला आताच कोंडून ठेवला.. म्हणाल्या आता जा बाहेर जेवायला, आधी खोली आवर मग बाहेर काढीन तुला.

     


    बिच्चारा सनी…. मग तोही चिडला आणि आतून कडी लावून घेतली. थोडी आदळ आपट केली पण काही उपयोग नाही. म्हणून शेवटी खोली आवरायचं ठरवलं. शेवटी नाइलाजानी का होईना, आपण साफ होणार म्हणून त्या खोलिनी निश्वास टाकला.
    अशा रितीने सनी महाराज कामाला लागले. एक एक पसारा पहिले जमिनीवर ओतला. ते चित्र बघितलं ना तर काय वाटेल सांगू का?? जुना बाजार असतो ना ढिगानी वस्तू लावून ठेवलेल्या असतात त्यात.. त्यातलं दुकान वाटत होता.. काय काय गोळा केलेलं.. वा वा… अगदी इयत्ता पहिली पासूनच्या गोष्टी असाव्यात. त्या जशा जशा डोळ्यासमोर येत गेल्या तसा हा पठ्या विसरत गेला की आपल्याला हे सगळे आवरायचे आहे. बेटा त्या एकेका गोष्टीत इतका हरवत जायचा. जणू त्याच्या डोळ्यासमोर तेव्हाच्या सगळ्या घटनांचा जणू चित्रपटच चालू होता. त्याला दिसत होते ते त्याचे लहानपणीचे मित्र मैत्रिणी; हा पप्पू, ही रिंकी, ही टीना, हा राक्या, अरे बोनी कुठे दिसत नाही ते… अरे हा सापडला… हा आपल्या मुंजीतला फोटो. सगळेच आहेत की जमलेले. सध्या कुठे असतील हे सगळे?? बऱ्याच दिवसात,,, छे छे वर्षात म्हणावे लागेल, बऱ्याच वर्षात भेटले नाहीयेत. हा सगळा ९वी चा ग्रुप. हाच सगळाच्या सगळा पुढे १०वी ब मध्ये आलेला.फक्त तो विकी तेवढा नव्हता आपल्यात, नाही. शाळा बदलली त्यांनी. काय करतोय कुणास ठावूक. अरे हा बॉक्स कसला आहे??? अरे बापरे कसे विसरलो आपण??? यात तर सगळी भेट कार्ड आहेत आपल्याला मिळालेली. वाढदिवसाची, दिवाळीची, नवीन वर्षाची. हे कोणी दिलेलं?? हे नीरज चं, हे कोण सारंग, हे सायली, हे अप्पू, हे.. असू देत खूप आहेत.. नंतर बघू.

    असं सगळं चालू होता. बाहेर आई आपली वाट बघतेय महाराज आत्ता येतील मग येतील. तिला कुठे माहिती आहे आत काय चालू आहे. ती वाट बघतेय त्याची जेवायला. हाक मारून पण काही उपयोग नाही झाला. सनी तंद्रीत होता ना… जाऊन कडी उघडून बघितली तर त्यांनी आतून लावून घेतलेली…. शेवटी तिने नाद सोडून दिला आणि जेवून घेतलं आणि झोपली. हे महाराज सगळ्या आठवणींमध्ये फिरून आल्यावर भानावर आले. बघतात तर घड्याळात दुपारचे ५ वाजलेले. भराभर सगळं आवरलं. आणि बाहेर पडायला जातो तर दर बंद. मग त्याला आठवतं.. अरे आईनी दर लावलेलं आवरत नाही म्हणून. मग हाक मारल्यावर आईनी दर उघडलं आणि आधी घाई घाईत त्याच्यावर प्रश्नांचा भडिमारच सुरु केला. आणि मधेच थबकलिच खोलीचं रूप बघून. आणि लाडाने सनीला जवळ घेत म्हणाली. अरे बाबा मला किती काळजी वाटत होती. वाटलं काय करतोय हा दार लावलं तर… मी मध्ये उघडून बघायला आले तर तू आतून लावून घेतलेलस. चल जेवायला भूक लागली असेल ना???

     


    अशी एकंदरीत ती खोली आवरली गेली पण त्याबरोबरच सनीला त्याच्या आठवणीच्या खजिन्यातले अनेक हरवलेले मोती मिळवून देणारी ठरली. मग मित्रांनो तुम्ही कधी शोधताय तुमचे हरवलेले मोती???? तुमच्या उत्तराची वाट बघतोय हं….
  • सुरांचा बाजार

    नमस्कार, आज मी आपल्या पुढे पहिल्यांदाच मराठीत एक विषय मांडणारे. सध्या आपल्या सगळ्याच टी व्ही चानेल्सवर संगीताच्या स्पर्धांचा अक्षरशः रतीब घातला जातोय. कोणे एके काळी अत्यंत वरच्या दर्जाच्या असणाऱ्या या स्पर्धा आता टी आर पी च्या नादात आपला दर्जा घालवून बसल्या आहेत. मला अजून पण आठवतं, काय त्या एक एक स्पर्धा होत्या, आणि सगळे स्पर्धा उत्तम गाणारे. आणि त्यांचे मूल्यमापन करायला जुने जाणते संगीत तज्ञ. आजच्या सारखे मतांच्या बाजारात निकाल विकले जात नव्हते त्या काळी. अंतिम फेरी तर सगळ्या स्पर्धेचा परमोच्च बिंदूच. परीक्षक सांगतील ते गाणे गा, जमले तर तरलात नाही तर घरी. किती उच्च दर्जाचे गायक त्या स्प्रधांनी आपल्या चित्रपट सृष्टीला दिलेत त्याची गणतीच नाही. सध्या म्हणजे नुसता बाजार भरवला जातो. आणि विजेत्याला भरघोस बक्षिसं वाटून मोकळे. नंतर हे विजेते कधी पार्श्वगायक म्हणून दिसतच नाहीत. सगळा आपला पैशांचा तमाशा होतो आहे. जे जिंकत नाहीत ते मात्र अनेक गाणी गौण जातात चित्रपटांसाठी. आता काय म्हणावे या सगळ्या उपद्व्यापांना देव जाणे. कधी तरी पुन्हा त्या स्पर्धांना त्यांचा पूर्वीचा दर्जा प्राप्त होवो हीच ईश्वर चरणी प्रार्थना करणे आपल्या हाती आहे बाकी काय….

  • Diwali :- Festival of lights….

    Hallo friends… Adi here once again came with new article…
    We celebrated biggest festival of India. Its Diwali……. The festival of lights and prosperity. Basic aim to celebrate this festival is to get together and share thought, enjoy some good time wid all relatives along with enjoying gr8 food and fireworks. Good food and fireworks are means of enjoyment not the basic aim to celebrate Diwali. Now a days we just focus on wasting money in creating noise and smoke and destroying environment. I don’t want to say that at time of diwali only these fireworks creates problem, but at time of 31st Dec. as well as at time of Olympic Games or such big functions they create lot of pollution. But all world just say that Diwali creates such problems. I know that there is problem of global warming, and we have moral responsibility to reduce pollution. At least we can decide that we will celebrate Diwali with crackers going high in sky so there will not be pollution near to ground and we can take healthy breath.
    Now a days there is lot of awakening in people about this issue. Many NGOs are working regarding this topic and they had some success. But there is lot of more scope for mare awakening. Hope we will be able to lift this issue world wide and will help our mother earth.
    I hope from nest year we will celebrate Diwali with lights not with crackers…