Category: ललित

  • ललित

    वास्तविक ललित साहित्याची गोडी लागली तेव्हा ह्यालाच ललित साहित्य म्हणतात हे देखील कळत नव्हतं. नेमका प्रसंग अथवा कोणाच लिखाण वाचलं ते आठवत नाही पण ‘अरे या आठवणी, हे अनुभव वाचायला आपल्याला जास्त आवडतंय’ इतक्या साध्या आवडीतून ते चालू झालं. मराठी वृत्तपत्रांच्या रविवार विशेष पुरावणीतले असे लेखच बहुदा याला कारणीभूत असावेत. लहानपणीची गोष्टी शोधणारी नजर हळूहळू असे लेख शोधू लागली होती.

    अनेक विषयांवर छोटेखानी लेख मला फार विशेष वाटायचे. शाळेत असतानाचे हे वेड पुरवायचा एकमेव मार्ग म्हणजे रविवार विशेष पुरवण्या. घरी येणारा गावकरी अन् सकाळ वाचून झाले की शेजारी – पाजारी येणारे इतर पेपर धुंडाळायला मी पसार व्हायचो. त्यावेळी कादंबरी वगैरे इतर दीर्घ विस्ताराच्या लिखाणाकडे माझं फारसा ओढा नव्हता (तसा तो अजूनही कमीच आहे पण आजकाल मधून मधून ते पण वाचले जाते.) त्यामुळे घरच्यांनी वाचनालयातून आणलेल्या पुस्तकांवर माझं डोळा फारच कमी असे.

    पुढे सायकल पिटाळीत शाळेत जाणे चालू झाले. माझ्या शाळेच्या रस्त्यावरच नाशिकचे सार्वजनिक वाचनालय लागायचे. माझे आजोबा त्याचे आजीव सभासद. घरी यायची ती पुस्तकं इथलीच असत. (more…)

  • Human rights – have we understood what it is?

    Everyone in the world is talking about innocents getting killed in Gaza strip by attacks of Israel. All of a sudden there are talks about human rights from all over the globe. Indeed, war is action to be condemned. I don’t want to pick any side in ‘Israel-Palestine’ conflict but these hooting for human rights across the globe are really make me think. Have we seriously understood what the human rights are exactly? According to me human rights are the right to breathe fresh air; to drink water; to have ample of food and assured safety of life for every person on the world irrespective of his or her nationality, religion, cast, age, sex, economic status or any other criteria of discrimination.

    Even there are lots of conflicts occurring currently or have occurred in very recent past I don’t know why these so called humanitarians are hooting out only about human rights of innocent dying in Gaza strip in Israel attacks. (more…)

  • अस्वस्थ मी

    कधी कोणता विचार मनात डोकावेल हे सांगता येण खरच कठीण आहे बुवा. खर सांगायचं तर मी आत्ता रात्री २:३० ३ ला जागं असण्याचा काडीचाही संबंध नव्हता. पण गल्लीतल्या श्वान परिवारातील सदस्यांनी आपल्या जातीबांधवांना जणु कुठल्याशा आकस्मिक सभेला आवतण द्यायला सूर लावले अन् निद्रादेविनी माझ्याशी फारकत घेतली. तिकडे दूरवरच्या श्वान बंधुंनी लागलेल्या सूरात सूर मिसळले.

    खोलीतला गुडुप आंधार टक्क उघड्या डोळ्यांनी बघत मी अंथरुणात पडून होतो, भींतीवरल्या घड्याळातला सेकंद काटा आपल्या टिकटिकीनी त्याला मिळालेल्या उपेक्षेचा जणू सूडच घेत होता. (more…)

  • इट्स ऑल अबाउट प्रायॉरीटी

    मध्यंतरी फेसबुकवर एक उपदेश झळकत होता. “No one is busy in this world, its all about priority”. बऱ्याचदा हा संवाद तोंडावर फेकला जातो तो दोन व्यक्तींमध्ये नं उरलेले संभाषण संवाद अथवा नं होणाऱ्या भेतीगाठींबद्दल. असाच काहीसा उपदेश वाचता वाचता मनात विचार येत गेले पण त्या वेळी ते लिहिले गेले नाहीत. You know, after all it’s all about priorities. अर्थात मीही काही तुमच्याहून वेगळा नाहीये. तुम्हीही म्हणाल हा लागला प्रवचन द्यायला, पण आज मी थांबवणार नाही कारण आता या लिखाणाला माझं प्राधान्य आहे.

    हा तर मी सांगत होतो, हे बिझी असणं, खूप कामं असणं बऱ्याचदा कोणाला भेटायच्या वेळी वापरला जातं खरं पण बघा नं कित्येक वेळेला आपण आपल्याला एखादी गोष्ट का जमत नाही तेव्हा हेच उत्तर पटकन तोंडावर येतं. “काय रे गाणं वगैरे चालू आहे का सध्या?” “छे रे आता वेळच होत नाही बघ”. “यार तुझी चित्र जाम भारी असायची, सध्या ब्रश अन् रंग थंडावलेले दिसतायत.” “हो रे काय करणार, कामं इतकी वाढली आहेत. मान वर करायला वेळ नाही.” इत्यादी इत्यादी संवाद कायमच आपल्याला ऐकू येतात.

    खरंच आपण इतके हरवलेले असतो का? वास्तविक पाहता हे गाणं, चित्रकला वगैरे वैयक्तिक आनंदासाठीच असतं. पण स्वतःला देण्याइतका पण वेळ आपल्याकडे नसतो आजकाल. बाकी मित्र मंडळ, समाजात मिसळणे वगैरे तर मग दुरचीच गोष्ट. अन् समाजकार्य, एखाद्याला मदत असल्या गोष्टींसाठी मग रिटायर्ड झाल्यानंतरचा वेळ आपण सोयीस्करपणे राखून ठेवतो. जणू आपण भविष्य बघुनच आलेलो असतो की आपण रिटायर्ड झाल्यावर एकदम टूणटूणीतच असणार आहोत. पण या साऱ्या ‘नंतर करू’ मध्ये आपण हे विसरतो की याच छोट्या छोट्या गोष्टींमधून आपल्याला किती आनंद मिळतो.

    मी बिझी आहे हे उत्तर आजकाल sorry आणि thank you इतकाच वापरून वापरून पुचाट झालाय. मग ते काम असो की स्वतःचाच छंद. लहान लहान मुलं देखील आईनी आजीनी एखादं काम सांगितला की मोबाईल वर गेम खेळता खेळता उत्तर देतात “मला वेळ नाही नंतर करतो.” एकूणच सारे जण आपण फार कामात बुडून गेल्याचा मुखवटा घालून फिरत असतो सदैव. एकूणच साऱ्या जीवनाचाच प्राधान्यक्रम एकदा बसून ठरवायलाच हवा आहे. अर्थात यासाठी तुम्ही busy नसाल तर…

  • निवडणूक २०१४ : थोडे माझ्या मनातले

    फार दिवसांनी आज लिहितोय. बऱ्याच गोष्टी आजूबाजूला घडत होत्या, निवडणुकांची धामधूम होती, त्यावर रंगणाऱ्या उच्च स्वरातल्या चर्चा वृत्तवाहिन्यांवरच काय तर आपल्या आजूबाजूला नाक्या-नाक्यावर पण घडत होत्या. इतक्या प्रचंड प्रमाणात समाजाला हलवून टाकणारी माझ्या आठवणीतली ही पहिलीच निवडणूक. अर्थात या आधी झालेल्या निवडणुकांच्या वेळी तसं काही फार कळत नव्हतं. किंबहुना आत्ताही आपण फार मोठे राजकारण पंडित झालोय अशातलाही भाग नाही. पण गेले दोन तीन महिने जे काय बघत होतो, ऐकत होतो अथवा पेपरमध्ये वाचत होतो त्याचा कळत नकळत कुठे तरी मनात विचार चालूच होता.

    आपण कितीही म्हटलं मला राजकारणात रस नाही, तरी देखील या साऱ्या वातावरणात मनात फक्त आणि फक्त या निवडणुकांचाच विचार साऱ्यांच्या मनात चालू असणार. गेल्या ४-५ वर्षात ज्या प्रमाणात भारतात देशाला शरमेनी मान खाली घालायला लागतील अशा प्रकारचे घोटाळे, अतिरेकी हल्ले, शेजारी राष्ट्रांनी काढलेल्या कुरापती आणि त्यावर सरकारचे तेच ठरलेले “तीव्र शब्दात निषेध” करून कबुतरं उडवणे या साऱ्यांनी भारतीय मन कुठे नं कुठे निश्चितच अस्वस्थ होत होते. प्रत्येक जण बदलाची वाट पाहत होता. अनायासे ती संधी या निवडणुकांमध्ये आपल्याला मिळाली आणि साऱ्याच जनतेनी बदलाच्या बाजूनी कौल दिला.

    या वाढलेल्या मतदानाच्या टक्केवारी मागे नक्कीच ही गेल्या ४-५ वर्षातली निराशा प्रेरक ठरली असणार. मध्यंतरी “आप” वाला एक पर्याय उपलब्ध झालं होता पण दिल्लीत घाईत सत्ता हस्तगत घेऊन तितक्याच त्वरेनी राजीनामा देण्याच्या निर्णयांमुळे कुठे नं कुठे त्यांच्यावरचा विश्वास नक्कीच डळमळीत झाला असणार. पण मोदींच्या पाठीमागे होती ती त्यांची संघटन कुशलता आणि गेल्या १२-१३ वर्षाच्या गुजराथच्या प्रगतीचा सतत उंचावणारा आलेख. इतक्या झंजावती प्रकारे प्रचार करणारा नेता माझ्या बऱ्याचशा ऐकीव आणि थोड्या बहुत वैयक्तिक अनुभवात तरी पहिलाच पाहत होतो.

    आता निवडणुकीत हरल्यावर कोंग्रेस आणि बाकी सारे म्हणतात की मोदींनी अत्यंत पद्धतशीर प्रचार केला, सोशल मीडियाचा भरपूर उपयोग केला म्हणून ते जिंकले. अरे पण मला सांगा, प्रचार हा पद्धतशीरच करायचा असतो नं. आपलं उभे राहिलोय तर काही तरी केलं पाहिजे म्हणून प्रचार केलात तर हरणार आहातच. त्यांनी योग्य प्रचार केला म्हणून ते जिंकले असं म्हणणं म्हणजे एक प्रकारे तुम्ही त्यांना योग्य कार्याचे प्रशस्तीपत्रकच देताय की.

    असो. बाकी लोक काहीही म्हणोत पण अटलजींच्या अत्यंत उत्तम कार्याकालानंतर गेल्या २ निवडणुकांमध्ये ११५ च्या आसपास जागा मिळवणाऱ्या ‘भाजप’ला एकहाती बहुमत मिळवून देण्याची करामत मोदींनी नक्कीच करून दाखवली आहे. एक कुशल संघटक आणि अमोघ वक्ता म्हणून त्यांना याचे पूर्ण श्रेय द्यायलाच हवे. पण हा विजय म्हणजे एक प्रचंड मोठं जबाबदारीचं दडपण आहे. देशाचा प्रत्येक नागरिक मोदी सरकारच्या प्रत्येक निर्णयावर बरीकाईनी नजर ठेवून असेल. आणि विरोधक तर डोळ्यात तेल घालून मोदी सरकारची एखादी किरकोळ चूक देखील नजरेआड होऊ देणार नाहीत.

    देशातील प्रत्येकाच्या नव्या सरकार कडून अपेक्षा आहेत. तरुणांच्या उच्च शिक्षणाच्या, रोजगाराच्या तर महिलांच्या सुरक्षेसाठी अपेक्षा असतील. सैन्यदलाला अपेक्षा असेल ती शेजारी राष्ट्रांनी काढलेल्या कुरापातींना कठोर उत्तर देण्याची, शिवाय त्याच वेळी अंतरराष्ट्रीय स्तरावरून अपेक्षा असतील की भारतीय उपखंडात युद्धाला तोंड फुटू नये याची. साऱ्या जनतेची एकूण पायाभूत सुविधांसाठी अपेक्षा असेल, महागाई आटोक्यात आणण्याची अपेक्षा असेल. उद्योग जगाकडून आयात-निर्यात धोरणाबद्दल अपेक्षा असेल, पोलीस दलांच्या आधुनिक तंत्रज्ञान आणि पुरेशा मनुष्यबळाच्या अपेक्षा असतील.

    या साऱ्या अपेक्षांच्या ओझ्याखाली दाबून न जाता सम्पूर्ण कार्यक्षमतेने काम करणे खरोखरच एक कसोटी असणार. पण ५ वर्षाचा कालावधी या साऱ्या अप्केशांच्या पूर्ततेसाठी तसा कमी आहे. पण त्यादृष्टीनी काही पाऊले तरी नक्कीच या काळात पुढे टाकली जातील अशी अपेक्षा सारेच भारतीय करत असणार. त्या पुढील वाटचाली साठी साऱ्या भारतीयांकडून नवीन सरकारला खूप शुभेच्छा!!!

  • पाऊलखुणा

    शांत निरव संध्याकाळ, जरा रात्रीकडे झुकलेली. क्षितिजावर रक्तिम छटा पसरलेली होती. आजूबाजूला असलेला माणसांचा वावर मनाला जाणवत नव्हता. कुठल्याश्या अनामिक पोकळीत ते कधीचे भरकटत होते. भोवताली रोरावणारा समुद्र, धीर गंभीर आवाज करत त्या किनाऱ्यावर मला सोबत करत होता. अनवाणी चालताना ओल्या वाळूचा तो थंड स्पर्श मनाला सुखावून जात होता. पाठीमागे पाऊलांचे ठसे सोडत, आठवणींचा धागा पकडून पुढे जाताना माझे एकांडे मन भूतकाळात जात होते. स्वतःशीच आतल्या आत हितगुज करत होते.

    कॅलीडोस्कोपच्या रंगीबेरंगी काचांतून येणारे रंगीबेरंगी कवडसे त्या संधीप्रकाशात मनाच्या पडद्यावर आठवणींची नक्षी उमटवत होते. साऱ्याच आठवणी हृद्य. कधी ओठांवर हसू तर कधी डोळ्याच्या पाणावलेल्या कडा. स्वतःशीच चाललेला हा संवाद समुद्राच्या त्या गंभीर आवाजाच्या लयीत झोके घेत होता. कधी गोड आठवणींचा हा प्रवास किती वेळ चालू होता कळायला भान नव्हते. संधीप्रकाशाचा मिट्ट काळोख कधी झाला कळलेच नाही.

    त्या प्रवासाला वेळेचे भान नव्हते, मुक्कामाचा पत्ता नव्हता. प्रवास अखंड चालू होता आणि चालू राहणार होता. असंख्य विचारांच्या लाटांवर लाटा येत होत्या. मनावर उमटणाऱ्या आठवणी लाटेबरोबर पुसल्या जाणाऱ्या पाउलखुणांबरोबरच वाहून जात होत्या. पुन्हा पाटी कोरी. आठवणींच्या नवीन नक्षी साठी. फक्त पुढची लाट येई पर्यंत.

    आलेली लाट आधीच्या पाउलखुणा बरोबर घेऊन गेली. सागर किनाऱ्याची ती कोरी पाटी बघून क्षणात तुझी आठवण आली. अशाच ओल्या वाळूवर तू कलाकुसरीसह लिहिलेले तुझे नी माझे नाव लाट घेऊन गेली म्हणून थोडा मागे बसलेल्या माझ्याकडे तू तक्रार करत आली होतीस. आठवतंय? तक्रार करत शेजारी येऊन बसलीस. हातात हात घेऊन. त्या दिवसापासून तुला सांगीन म्हणतो पण जमत नव्हतं. तुझ्या बोलण्याकडे माझं लक्ष नसतं म्हणून तु कायम चिडचिड करायचीस. एक दिवस अशीच चिडून जी निघून गेलीस ती कायमचीच. तेव्हापासून मनात लपलेल्या गोष्टी आज बाहेर उतरल्या बघ.

    तुझ्या बरोबर असताना मन कस शांत असायचं. एकदम निश्चल. विचारांची गर्दी सोडाच पण एकही विचार डोकवायचा नाही. त्याही दिवशी असाच झालं. हातात हात घेऊन अशीच शेजारी बसलेलीस, खांद्यावर मान टाकून. शांत निवांत किनाऱ्यावर. माझी नजर तुझ्या लांबसडक बोटांवर खिळलेली. माझ्या हातावर तुझ्या बोटांनी काहीबाही रेघोट्या मारत बोलत होतीस. तुझ्या नाजूक बोटाचा स्पर्श, हळुवार येणारे लाडिक शब्द. एक झिंग चडत गेली. शब्द कानावर पडत होते पण डोक्यापर्यंत काही केल्या पोचत नव्हते. जणू तुझ्या स्पर्शाची नशा अंगात भिनलेली होती. आणि अचानक खडबडून हलवल्याने मी भानावर आलो.

    इतका वेळ मंजुळ असलेला तुझा आवाज चिडका होता आणि माझं कधीच लक्ष नसल्याची तक्रार करत तू उठतेस न चालायला लागलीस. मीही तडक उठून तुझी मनधरणी करायला मागे धावलो. वाळूवर तसेच पावलाचे ठसे सोडत. तेव्हा कल्पनाही नव्हती असेच ठसे सोडत तू कधी तरी निघून जाशील ती पुन्हा कधीही न येण्यासाठी. येणाऱ्या लाटेबरोबर वाळूवरची पावले तर वाहून गेली. पण मनावर उमटलेली ती पावलं अजूनही तशीच आहेत. ती कधी वाहून जातील तर माझ्याबरोबरच.