Category: दीपस्तंभ

They amazed me, inspired me like a lighthouse.

यांच्या उत्तुंग कार्तुत्वानी मनात घर केलं आणि लेखणीतून हे शब्द उमटले.

  • K for Kishore

    Follow my blog with Bloglovin
    Kishore Kumar… Legend was born in Khandwa in the rainy month of August in Ganguly family with the name of Abhas Kumar Ganguly in 1929. It took 17 years for Abhas to become Kishore and start charming people of India with his voice. He got his first break in 1946 with film Shikari. Hey, but you all can get this information on his Wikipedia page.  For me, Kishore is the legend. He is one of the pillars of amazing Hindi film music. I think Kishore had given his voice to almost every superstar during his active years.

    You will find at least 3-4 songs for every mood and situation with his voice. I am putting up the list of my most favorite 10 songs of Kishore Kumar for you guys as a tribute to his melodious voice. It’s really tough list to make. Hope you all will enjoy. This is not top 10 list, I enjoy all the songs equally.

    1 – Neele Neele Ambar Par

    Film: Kalakaar (1983)

    Music: Kalyanji – Anandji

    2 – Tu Tu Hai Wahi – Duet with Asha Bhosale

    Film: Yeh wada raha (1982)

    Music: R. D. Burman

    3- Keh du tumhe ya chup rahu

    Film: Deewar (1975)

    Music: R D Burman

     

    4 – Nadiya se dariya

    Film: Namak Haram (1973)

    Music: R. D. Burman

    5 – Pag ghungaru bandh

    Film: Namak Halal (1982)

    Music: Bappi LahiriK for KishoreK for Kishore

    6 – O sathi re

    Film: Muqaddar Ka Sikandar

    Music: Kalyanji – Anandji

    7- Meet na mila re manka

    Film: Abhiman (1973)

    Music: S. D. Burman

    8 –  Bhaware ki gunjan

    Film: Kal Aaj Aur Kal (1971)

    Music: Shankar Jaykishan

    9 – Yeh dil na hota bechara

    Film: Jewel Thief (1967)

    Music: S. D. Burman

    10 – Phoolonka taronka

    Film: Hare Rama Hare Krishna (1971)

    Music: R. D. Burman

    Guys, list is endless. These are just first 10 came to my mind when I started making list.

    ~~~~

    I am participating in A to Z challenge with Blogchatter and this is my take on day 11 challenge. “K for Kishore”

  • आजीची गोष्ट

    आजीची गोष्ट

    मी लिहिता झालो त्याचं कारण मला काहीकेल्या आजतागायत सापडलं नाहीये. गेली ६-७ वर्ष सुचेल तेव्हा सुचेल ते लिहीत गेलो. बऱ्याचदा धागा अर्धवट तुटायचा, कधी वीण पूर्ण जमायची. पण मी वाचता, ऐकता झालो त्याचं कारण म्हणजे आमची आजी. माझ्या आयुष्यात गोष्टींचा कवितांचा प्रवेश झालं तो आजीच्या तोंडूनच. अगदी लहानपणी मला वाटायचा, “आजी कित्ती हुशार आहे नाही. इतक्या गोष्टी पाठ आहेत तिला.” अन् ती सांगायची पण इतकी रंगवून की शेवट येई पर्यंत उत्कंठा अगदी शिगेला पोहोचली असे. राम, कृष्ण, इसापनीती अशा पारंपारिक गोष्टींबरोबरच ती बाकीच्याही गोष्टी सांगत असे. त्यात राजा राणी, जंगल, राक्षस असं काही नसे. आमच्यासारख्याच छोट्या मुलांच्या गोष्टी असत. कधीही तिनी पुस्तकातून गोष्टी वाचून दाखवल्याचं मला आठवत नाही.

    रविवारच्या मुलांच्या पुरवणीत पहिल्यांदा आजीचा नाव वाचला तेव्हा लक्षात आलं, अरे या गोष्टी आजीनी पाठ केलेल्या नाहीयेत, ती स्वतःच लिहिते. दर रविवारचा पेपर उघडून बघायची घाई झालेली असायची. गोष्टीखाली आजीचं नांव दिसलं रे दिसलं की अधाशासारखी मी ती वाचून काढायचो. पण जर नाव नसेल तर मात्र हिरमोड हून मी त्या पपेरला हातही नाही लावायचो. आजी कधी लिहिते याकडे लक्ष ठेवायला लागलो. तिचं नाव पेपर मध्ये वाचायला बघायला मोठी मजा वाटायची. पुढे केवळ आजीनी सांगितल म्हणून बाकीच्या गोष्टीही वाचू लागलो आणि हळू हळू वाचनाची आवड लागली.

    मला आजही आठवतं, एका उन्हाळ्याच्या सुटीत; पाचव्या सहाव्या इयत्तेची असेल कदाचित; आजीच्या कपाटात एका वेगळ्याच रंगाचा कव्हर असलेला पुस्तक दिसलं. चांगला मोठ्ठ होतं. सहज उत्सुकता म्हणून हातात घेतला. त्यावर असलेल्या पिवळ्या रंगाच्या बाईंडिंगचं फारच अप्रूप वाटत होत. चालून पाहू काय आहे ते म्हणून उघडलेलं पुस्तक त्यानंतर मान पाठ एक करून ३ दिवसात संपवूनच मी ठेवलं. आयुष्यात वाचलेलं पाहिलं मोठं पुस्तक, ‘श्रीमान योगी’. त्यानंतर आजीच्या मागे लागून त्यातली कित्येक पुस्तक मी वाचून काढली.

    आजीही लिहीत होतीच. आजी केळवल मुलांच्याच गोष्टी लिहिते हा माझा समज कुठल्याश्या बुधवार गुरुवारच्या पेपरच्या पुरवणीनी साफ चुकीचा ठरवला. आजीची एक कुठलीशी कविता आणि एक लेख त्या पुरवणीत छापून आला होता. भोवताली घड्या कुठल्याही गोष्टी आजीच्या नजरेतून सुटत नसता. कुठे बारीकसं जरी कथाबीज दिसलं की पुढच्या दोन दिवसात आजीची गोष्ट तयार असे. घडणाऱ्या घटना इतक्या बारकाईनी अभ्यासता येत की नक्कीच एखाद्या पेपरमध्ये स्तंभ लिहू शकली असती पण तिने तिचं लिखाण आजपर्यंत केवळ छंद म्हणूनच जपलं.

    तिच्या राम-कृष्णांच्या गोष्टीतही फारशी चमत्कृती नसते. केवळ अवतार म्हणून कुठलेही चमत्कार तिनी गोष्ट म्हणून सांगितले नाहीत. त्यांच्या कृतीतून दिसणाऱ्या त्यांच्या चातुर्य, शौर्य, लोकांना बरोबर नेण्याची त्यांची हातोटी अशा चांगल्या गुणांबद्दल आजी सांगायची. पण कोणताही पुरावा असल्याशिवाय आजीनी राम-कृष्णांच्या गोष्टीसाठी कोणत्याही घटना घेतल्या नाहीत.

    कितीतरी वेळा आजी शिबिरांमध्ये जाऊन गोष्टी सांगायची. पण आता वयापरत्वे असं कुठे जाणे होत नाही. पण नवनवीन गोष्टींना काही अंत नाही. पूर्वी गोष्टी, कविता, लेख लिहून झाले की ते वृत्तपत्रांच्या कार्यालयात पोचवायची जबाबदारी आम्हा नातवंडांवर असायची. पण आता दुसऱ्या शहरात असल्यानी पोस्ट खाते इमाने इतबारे आजीची सेवा करतं. आज जी काही थोडफार वाचनाची आवड आहे. सुचेल तसे जे लिहीत असतो तो केवळ आणि केवळ आजीचं आशीर्वाद. तिने अजूनही आमच्यासाठी अशाच चं गोष्टी लिहीत राहाव्यात हिच ईश्वर चरणी प्रार्थना.

  • I wish i could be like…

    creatives-secret-wish-list-banner

    I wish i could be like Niraj, so great but yet so simple.
    Always feet touching to ground and mind flying up in sky. Even being extraordinarily talented he never boasted on it. It was really my fortune i had chance to be with him every day for 15 years.

    Seems god have felt scarcity of such great soul. I really miss you Niraj..
    I will be happiest person of i can be like you for just 10%.

    नीरज ये शेर अर्ज है तुम्हारे लिये…

    इस कदर भरी मेहफिल से निकल न जाया करो
    हमसे हमेशाके लिये यु परदा न करो.
    न करो यू सितम के जान निकल जाए
    के गझल भी हमसे रुठ कर निकल जाए.

  • भटक्या…

    भटक्या…

    चित्रकार – मुकुंद

    दुर्गभ्रमंती म्हटलं की तरुणाईच रक्त सळसळत. आणि पावसाळ्यात तर जास्तीच. पण काही वर्षांपूर्वी जर हा विषय कुणी काढला असता तर एका म्हाताऱ्याचं रक्त नक्कीच सळसळलं असतं. तुम्ही म्हणाल काय चेष्टा करता काय. म्हातारा कशाला दुर्गभ्रमंती मध्ये उडी मारेल. अर्थात तुमचा प्रश्न स्वाभाविक आहे. तुम्हा आम्हालाच साधी पार्वती चढायची म्हटलं तर ऐन तारुण्यात धाप लागते. परंतु हा म्हातारा अगदी विलक्षण होता. वय बघीतलं तर म्हाताराच म्हणायचं पण शरीर आणि त्यापेक्षाही मनानी हा माणूस चिरतरुण होता.

    गोपाळ नीलकंठ हा दांडेकरांच्या कुटुंबातील म्हातारा दुर्ग म्हटलं रे म्हटलं कि अर्ध्या रात्रीतही उठून सर्वांच्या पुढे चालू लागेल. खांद्याला पिशवी लटकवायची, तहान लाडू भूक लाडूचा शिधा उचलायचा आणि चालू लागायचं असा गो नी दां चा नित्याचा कार्यक्रम. किल्ला कुठलाही असो, वेळ, काळ, ऋतू, कोणताही असला तरी गो नी दां चा उत्साह तेवढाच. आणि असंही नाही कि एकटेच भटकतील, दर वेळी तरूणांच एखादा टोळक बरोबर घ्यायचं कधी एखादाच सोबती घ्यायचा आणि एखाद्या किल्ल्यावर चढाई करायची.

    नीलकंठ आणि अंबिका दांडेकरांच्या पोटी जन्माला आलेल्या बारा भावंडामधले एक गोपाळ. ८ जुलै १९१६ साली अमरावती जिल्ह्यात गो नि दां चा जन्म झाला. विदर्भात नागपूर येथे शिक्षण घेत असताना वयाच्या तेराव्या वर्षी महात्मा गांधींच्या तरुणांना दिलेल्या हाकेला उत्तर म्हणून हा मुलगा घरातून जो पाळला तो फारसा घरात परत कधी टिकलाच नाही. त्यांचा जन्म झाला तोच मुळी दुर्गभ्रमणासाठी असं म्हटल्यास काहीच गैर होणार नाही. हा माणूस घरी कमी आणि गड-किल्ल्यांवरच जास्त सापडायचा. लेखन कार्यही एकीकडे चालू होतंच. त्याच दरम्यान त्यांचा राष्ट्रीय स्वयंसेवक संघाशी संबंध आला आणि संघाचे प्रचारक म्हणूनही त्यांनी भटकंतीची मिळालेली संधी सोडली नाही. संघाच्या विचारांचा पडलेला प्रभाव आणि राष्ट्रीयत्वाची तीव्र जाणीव जी एकदा झाली ती आयुष्यभर जाणवत राहिली. संघ बंदी दरम्यानचे सत्याग्रह, संयुक्त महाराष्ट्राची चळवळ, गाडगे बाबांचे कार्यकर्ते म्हणून त्यांनी सामाजिक कार्यात सक्रीय सहभाग तर घेतलाच पण स्वातंत्र्य पूर्व काळामध्ये क्रांतीकारकांना भूमिगत असताना मदत करून स्वातंत्र्याच्या प्रयत्नांनाही त्यांनी हातभार लावला.

    आयुष्यात ऐहिक गरजा भागावाण्यासाठीचे एक साधन म्हणूनच बहुदा त्यांनी नोकरी केली. आयुष्यातील पहिली नोकरी केली ती पुण्याच्या “इतिहास संशोधन मंडळा”त संदर्भांच्या नावानिशी याद्या करण्याची. त्यातही त्यांनी ऐतिहासिक संदर्भ मिळवणे हा आपला एक उद्देश सफल करून घेतलाच. किंबहुना त्याकरताच हि नोकरी पत्करली. पगार मिळवला तो अखंड रुपये ४. पुढे लग्न झाले आणि संसाराच्या वाढत्या गरजांपायी ते औंध संस्थानातून प्रकाशित होणाऱ्या पुरुषार्थ आणि वैदिक धर्म या मासिकांचे उपसंपादक म्हणून कार्यरत झाले. वैदिक साहित्यांचा गाढा अभ्यास असलेल्या पंडित सातवळेकरांच्या हाताखाली गो नि दां काम करत होते. त्यांच्याकडून खूप काही शिकत होते. कीर्तन कलेचा अभ्यास आणि सादरीकरण चालू होते. भूमिगत क्रांतीकारकांना मदत चालू होती या मुळेच पुढे त्यांना औंध सोडावे लागले.

    गो नी दां च्या कादंबऱ्या अत्यंत रसाळ आणि खिळवून ठेवणाऱ्या. पावनेकाठ्चा धोंडी, शितू, माचीवारचा बुधा, झुंजार माची, छत्रपती शिवारायांवराची पाच भागात लिहिलेली कादंबरी, तांबडफुटी, अशा अनेक रसाळ कादंबऱ्या लिहून त्यांनी साहित्य सेवा केली आहे. संत चरित्रात्मक लेखनातून त्या आदरणीय संतांना जणू त्यांनी वंदनच केला आहे. दास डोंगरी राहतो, आनंदवन भुवनी, ही समर्थांवर, मोगरा फुलाला हे संत ज्ञानेश्वरांचे, तुका आकाश एवढा हे तुकाराम महाराजांचे तर देवकीनंदन गोपाळा हे गाडगे महाराजांचे. सारीच चरित्रे अत्यंत मधाळ, गोड. अर्थात संतांचीच ती गोड असणारच पण गो नी दां नी लिहिली आहेत म्हणून त्या कार्याला गोडी तशी अधिकच आली आहे. त्यांच्या जैत रे जैत वर पुढे जब्बार पटेलांचा अत्यंत गाजलेला चित्रपट आला.

    स्मरण गाथा, आपल्या आयुष्यातील साऱ्या कडू गोड स्मरणांनी समृद्ध असलेले आत्मचरित्र गो नी दांनी सिद्ध केले ते आपल्याकडील अनुभवाची शिदोरी पुढच्या पिढीला देण्यासाठीच. या त्यांच्या अनुभवांसाठी त्यांना १९७६ साली साहित्य अकादमी पुरस्कार मिळाला. १९८१ सालच्या अकोल्याच्या साहित्य संमेलनाचे गो नी दां अध्यक्ष होते. १९९२ सालच्या डिसेम्बर मध्ये पुणे विद्यापिठानी त्यांना मानद डी. लीट्. पदवी देऊन त्यांचा सन्मान केला.

    १ जून १९९८ रोजी जणू आता भूतलावरील किल्ले मनसोक्त भटकून झाले, आता स्वर्गातील दुर्ग भ्रमंती करावी हा विचार करून गो नी दां हे जग सोडून गेले. आज २०११ पर्यंत त्यांनी तिथलेही सारेच दुर्ग पादाक्रांत केले असतील. त्यांच्या साहित्यांनी त्यांच्या भ्रमण गाथांनी सबंध महाराष्ट्राला भटकण्याची एक नवीन दृष्टी दिली हे नश्चितच. त्या वृत्तीच्या रूपांनी गो नी दां आपल्या सगळ्यांबरोबर पुनःपुन्हा लाडक्या किल्ल्यांना भेटी देण्यासाठी येताच असतात आणि येत राहतील…

  • शांता शेळके – मराठीतली साहित्यागंगा….

    आज सकाळी सकाळी बाहेर फिरत असताना वाऱ्याच्या झोताबरोबर एक कागद उडत आला आणि अंगावर पडला. काय आहे ते बघावं तरी म्हणून सहज कागद हातात धरला आणि पावलं थबकली. जुना कागाद होता. आणि त्यावर काही ओळी छापलेल्या होत्या. कविता वाटत होती म्हणून थांबून नीट वाचली. ते जुन्या बालभारतीच्या पुस्तकाचा पान होतं, आणि कविता होती “लाडकी बाहुली” कवयित्री शांता ज. शेळके. तिथेच बाजूला बाकावर बसून ती कविता मन लावून वाचली. किती तरी वर्षांनी ती कविता वाचायला मिळाली. ती पण अगदी अनपेक्षितपणे. कविता वाचता वाचताच मनात शांताबाईंच्या अनेक कविता येऊ लागल्या. गाणी उमटू लागली. जणू त्यांच्या गाण्यांचा आणि कवितांचा कार्यक्रमच मनाच्या थिएटरमध्ये चालू आहे. त्या कार्यक्रमाचा आस्वाद घेत घेत घरी आलो आणि हे लिहायला बसलोय.

    मला आठवतंय शांता शेळके या नावाशी ओळख झाली ती बालभारतीच्या पुस्तकांतून. शाळेत रुक्ष करून शिकवल्या जाणाऱ्या कवितांमधून खोल मनाचा ठाव घेणाऱ्या त्या मोजक्या कवितांमध्ये शांताबाईंच्या कविता निश्चितच आढळ स्थान मिळवून आहेत. वास्तविक शांता शेळके म्हणजे सगळ्या लहान मुलांच्या लाडक्या आज्जी. नातवंडांसाठी अनेक छान छान कविता, बालगीतं लिहिणाऱ्या. पण घरातही असं होतंच नं की आपले बाबा, काका, आत्या; आज्जी-आजोबांना ज्या नावानी हक मारतात त्याच नावानी आपण मारतो, तसाच आम्ही पण या शांत आज्जीला; शांताबाई शेळके असंच ओळखू लागलो. वास्तविक बालभारातीतून आम्हाला भेटायच्या आधीच शांताबाई आम्हा मुलांना छान छान गाण्यातून भेटल्या होत्या, पण तेव्हा कुठे काही कळत होतं? किलबिल किलबिल पक्षी बोलती, विहीणबाई विहीणबाई, अशी आमची अनेक आवडती बालगीत शांताबाईंनी लिहिली हे फार नंतर कळले. सांगण्याचा मुद्दा असा की अगदी औपचारिकपणे म्हणजे नेमून दिले म्हणून अभ्यास करा अशा वातावरणात शांत शेळके या नावाशी ओळख झाली, आणि त्यांच्या शब्दांतून जणू आज्जी आमचे लाड करतेय अशीच जाणीव झाली. मधुर शब्दांमुळेच त्या रुक्ष नावडत्या कविता विभागातून शांत शेळके या नावाशी मनाचा एक घट्ट नातं तयार झालं.

    वय वाढत गेलं, तसे मराठी हा विषय अभ्यासातून मागे पडत गेला आणि नेमून दिलेली कवितादेखील आयुष्यातून बाहेर पडली. पण त्या नेमलेल्या कवितांमधून ज्या शब्दांनी मनात जागा निर्माण केली ते पुनःपुन्हा वाचनात येत राहिले, ते कवी काव्यसंग्रहातून भेटत गेले. शांता शेळके तर फारच जवळच्या. त्यांचे वर्षा, रुपसी इत्यादी काव्यसंग्रह मनात ठसलेले आहेत. कधीतरी आकाशवाणीवर एखादं गाणं लागतं, आवडीचं म्हणून आपण मन लावून ऐकतो. गाणं संपतं, आणि नंतर होणारी उद्घोषणा त्याचा आनंद द्विगुणीत करते. तेव्हा कुठे कळत की हे तर शांतबाईंच गाणं आहे. तरुण वयात आपलीशी वाटणारी अनेक प्रेमगीतं त्यांनी लिहिली. कोळीगीतं लिहिली, “मागे उभा मंगेश पुढे उभा मंगेश” सारखी भक्ती गीते लिहिली. पं. जितेंद्र अभिषेकींच्या दोन नाटकांसाठी पदे देखील केली. “काटा रुते कुणाला” हे गझलच्या आकृतीबंधातले पद तर रसिकांच्या मनात अमर पदावर बसले आहे. इतकेच नाही तर “रेशमाच्या रेघांनी”, “नाव सांग सांग सांग नाव सांग”, अशा एकाहून एक ठसकेबाज लावण्या पण त्यांनी रसिकांसाठी दिल्या आहेत. “बांबूच्या वनात” सारखं पायांना हलवणार गाणं तर तरुणांनी डोक्यावर घेतलंय. “शूर आम्ही सरदार” आणि “मराठी पाऊल पडते पुढे” या सारख्या गाण्यांनी अनेकांना स्फुरण दिलंय.

    त्यांच्या कवितांबरोबरच त्यांचे गद्यलेखन सुद्धा खूप सुंदर आणि मनाला पकडून ठेवणारे आहे. वाचायला घेतले की सोडवत नाही पुस्तक. त्यांचे गुलमोहोर, कावेरी, बासरी, इत्यादी कथासंग्रह तर ओढ, धर्म, अशा कादंबऱ्या प्रसिद्ध आहेत. धूळपाटी नावाचे त्यांचे आत्मचरित्र सुद्धा खूप सुंदर आहे. स्वतःच्या लहानपनाबद्दलच्या त्यातील आठवणी तर आपल्याला हेवा करायला लावतात. तसेच “पावसाआधीचा पाऊस”, “आनंदाचे झाड”, “वडीलधारी माणसे” हे त्यांचे ललित लेख संग्रह खूपच बोलके आहेत. भाषांतर हे शांताबाईंच्या दृष्टीनी फक्त अर्थार्जनाचे साधन नव्हते तर स्वतःच्या भाषाभ्यासातील भर टाकणारेपण होते. त्यातील अत्यंत गाजलेले भाषांतर म्हणजे जपानी हायकुंचे. जपान मधील हा काव्यप्रकार त्यांनी अनुवादित करून मराठी रसिकांच्या पुढे “पाण्यावरच्या पाकळ्या” नावानी ठेवला आणि तो लोकांना इतका आपला वाटला की लोक आता मराठी हायकू असंच म्हणतात. तसेच त्यांनी ल्युइसा मे आल्कॉट्ट च्या “लीट्टील वूमन” या कादंबरीचा “चौघीजणी” नावानी अनुवाद करून १९६८ साली प्रसिद्ध झालेल्या त्या इंग्रजी कादंबरीतील चार बहिणींचे परस्परांवरील प्रेम, अशा-आकांक्षा, भविष्याबाबतची स्वप्नं, सारे सारे अस्सल मराठीतून आपल्यासमोर मांडले. या भाषांतराला तर फार प्रसिद्धी आणि प्रतिसाद मिळाला. शिवाय त्यांनी कालिदासाचे आजराअमर काव्य मेघदूत मराठी रसिकांसाठी मराठीत आणले.

    शांताबाईंना त्यांच्या साहित्यासेवेबद्दल अनेक पुरस्कार मिळाले. त्यातील उल्लेखनीय म्हणजे, १९९६ सालचा ग दि मा पुरस्कार. शिवाय त्यांना भुजंग या चित्रपटासाठी भारत सरकारचा गीतलेखनाचा पुरस्कार मिळाला तर “मागे उभा मंगेश, पुढे उभा मंगेश” या गाण्यासाठी सूर सिंगार पुरस्कार मिळाला. तसेच २००१ साली त्यांना यशवंतराव चावण प्रतिष्ठान कडून त्यांच्या साहित्यासेवेसाठी पुरस्कार देऊन गौरविण्यात आले.

    शांताबाईंची साहित्यसेवा इतकी अथांग आहे की त्यांना साहित्यागंगा म्हटलेले वावगे ठरणार नाही. फार पूर्वी भगीरथाने स्वर्गस्थ गंगा मानवाच्या कल्याणासाठी पृथ्वीवर आणली. पण जणू स्वर्गात साहित्यागंगेची अत्यंत निकडीची आवश्यकता भासली असावी म्हणून कोणी स्वर्गस्थ भगीरथ कॅन्सर च्या रुपात येऊन दिनांक ६ जून २००२ साली ही साहित्यागंगा स्वर्गी घेऊन गेला. तेव्हा पासून शांताबाई आपल्यात त्यांच्या साहित्यारुपाने वावरत आहेत आणि कायमच वावरतील.