Tag: sponsored

  • धागा – भावाबहिणीचे ग्रामीण मातीतले नाते उलगडणारा चित्रपट.

    धागा – भावाबहिणीचे ग्रामीण मातीतले नाते उलगडणारा चित्रपट.

    राखी, मग ती रेशमी असो, सोन्या-चांदीची असो, सुती असो की अगदी आजकाल येते तशी झगमग करणारी LED दिव्यांची असो; भावाबहिणीसाठी खूप पवित्र आणि ताकदवान बंधन आहे. धागा, ही ZEE5 ची फिल्म फिरते ती याच पवित्र बंधनावर. राज गुप्तांच्या दिग्दर्शनाखाली तयार झालीला हा चित्रपट साहिल केणे आणि अश्विनी लाडेकर यांच्या उत्तम अभिनयाने एका वेगळ्याच उंचीवर पोचतो. गोष्टीचा भर या नात्याच्या आजूबाजूने फिरत असला तरी या चित्रपटात घडणारं महाराष्ट्राच्या खेड्यातलं जीवन अत्यंत खुबीने दाखवण्यात यश आले आहे.

    4930286883_7be2623793_b

    शंकर आणि उमा या भावंडांच्या नात्याला धरून पुढे जाणारा हा चित्रपट मराठी ग्रामीण जीवनाच्या अनेक अंगांना अगदी सहजपणे स्पर्श करत जातो. चित्रपट सुरु होतो तोच अगदी मराठी मातीत रुजेलेल्या आणि तुम्हा आम्हाला आपल्या लहानपणात घेऊन जाईल अशा गोट्या खेळण्याच्या सीननी आणि तिथून आपण शंकरच्या मागे मागे फिरत हा सिनेमा बघतो. भावाबहिणीच नातं उमलत जातं पण त्याच बरोबर उमाच्या मनात रुजलेल्या प्रेमाचं दर्शनही या कथेत घडत जातं. या उलगडत जाणाऱ्या नात्यांच्या पार्श्वभूमीवर वाजणारं संगीत नक्कीच मराठी मातीत रुतलेलं आहे.

    रक्षाबंधनाच्या वेळेचं गाणं आणि त्या वेळेचं चित्रीकरण आपल्याला थेट ग्रामीण महाराष्ट्रात घेऊन जात. तिथलं छोट्या छोट्या सणांचं जे उत्साहाचं वातावरण असतं ते अगदी छोट्याशा सीन मधून अगदी छान दाखवल आहे. चित्रीकरणाची जबाबदारी समर्थपणे पेलणाऱ्या समीर दांडेकर चं कौतुक करावे तितके कमीच आहे. पण याच चित्रीकरणाला सुस्मित लिमये आपल्या पार्श्वसंगीताने एका वेगळ्या उंचीवर नेऊन ठेवतात.

    50121372_215464939396405_163418471662749537_n

    वास्तविक हे भावाबहिणीचं नातं काही आपल्या चित्रपटसृष्टीला नवीन नाही. श्रेयस तळपदे आणि श्वेता प्रसादचा “इक्बाल” तसच संजय सुरी आणि जुही चावलाचा “माय ब्रदर निखील” याच नात्याच्या काही वेगळ्या छटा आपल्यासमोर घेऊन येतात. अगदी इतकंच कशाला, चित्रपटाचा मुख्य विषय नसला तरी “जाने तू या जाने न” मधून दिसणारं जेनेलिया डिसुझा आणि प्रतिक बब्बर यांच्यातलं भावाबहिणीच नातं मनातल्या काही विशेष तारा छेडून जातं.

    अर्थात या नात्याचं महत्व म्हणा, किंवा आकर्षण म्हणा काय केवळ आपल्यालाच आहे असे नाही. आपल्याकडे जरी याला रक्षाबंधन आणि भाऊबीज असं धार्मिक महत्व असलं तरीसुद्धा साऱ्या जगाला या नात्यातलं प्रेम तितकंच प्रेमळ आणि महत्वाच वाटतं. असेच भावंडांच्या नातेसंबंधांचे वेगवेगळे पैलू अनेक इंग्रजी चित्रपटांमधून पण हाताळले गेले आहेतच. Her Name Is Sabine असेल, किंवा २००९ चा My Sister’s Keeper असेल, यातून सुद्धा भावंडांमधलं एक वेगळे नाते उलगडायचा प्रयत्न या चित्रपटाच्या माध्यमातून केलं गेला. अजूनही काही चित्रपट आहेत त्याबद्दल आपल्याला या पेजवर माहिती मिळू शकेल.

    पण या साऱ्या सिनेमांपेक्षा धागा या नातेसंबंधाचा एक वेगळा पदर घेऊन आपल्यासमोर येतो. ग्रामीण महाराष्ट्रातील जनमानसावर असलेला रूढी, परंपरा यांचा पगडा किती घट्ट आहे याचाही संदर्भ या चित्रपटात अत्यंत खुबीने गोवला आहे. याबद्दल याचे कथा पटकथा लेखक शाद्वल यांचे विशेष आभार मानायला हवेत. आणि त्याच बरोबर मराठी भाषेचा खास ग्रामीण लहेजा पकडण्याचे काम संवाद लेखकांच्या टीमने अगदी चोख बजावले आहे. त्यामुळे कुठेही चित्रपटाची पकड प्रेक्षकांवरून सुटत नाही. डॉ. भाग्यश्री चिटणीसांनी साकारलेली आई तशी पडद्यावर अगदी दोन तीन शॉटपुरतीच आहे पण आई म्हणजे वात्सल्य हे ठसवून गेली आहे. शंकरची मित्रमंडळी आणि उमाचा मित्र सुद्धा आपल्याला अगदी सहज आपल्या आजूबाजूला सापडतील यात शंका नाही.

    उमाच्या मनात रुजलेल्या प्रेमाचं काय होतं? वडिलांनी राखी पौर्णिमेच्या दिवशी सांगितल्याप्रमाणे शंकर आपल्या बहिणीची काळजी घेतो का? तिच्या पाठीशी उभा राहतो का? या साऱ्या प्रश्नांना या चित्रपटात अगदी छान आटोपशीर पद्धतीने हाताळले आहे. पण हा चित्रपट पाहिल्यानंतर माझ्या मनात काही प्रश्नांनी घर करणे सुरु केले आहे. त्याबद्दल पुन्हा कधीतरी…

  • काळजात उतरलेली कट्यार

    काळजात उतरलेली कट्यार

    18192468_1919179508297339_3990675473360239615_o.jpg

    अगदी राजे रजवाड्यांच्या काळापासून साहित्य संगीत नृत्य नाट्य आपल्या महाराष्ट्राला तसे नवे नाही. पण अभिनय आणि संगीत यांच्या एकत्र जोडीने मराठी मनाचा पगडा घेतला तो संगीत नाटकाच्या उदयापासून. देवल, खाडिलकर, मास्टर कृष्णराव, बालगंधर्व, दीनानाथ मंगेशकर, राम गणेश गडकरी, इत्यादींपासून सुरू झालेला हा लेखक संगीतकार गायक ही नावं घेत घेत आपण पोचतो ते पुरुषोत्तम दारव्हेकर यांच्यापर्यंत. सौभद्र, शाकुंतल, एकच प्याला, वगैरे नाटकांतून घेतल्या गेलेल्या विषयांपेक्षा एकदम वेगळा विषय दारव्हेकर मास्तर घेऊन आले. तसा तो विषय काही अगदीच अपरिचित होता अशातला भाग नाही. महाराष्ट्राला असलेल्या थोर शास्त्रीय संगीत परंपरेत या विषयाची थोडी बहुत चर्चा होतीच. पण संगीतात अगदी खोलवर रुजलेल्या घराणेशाहीला इतक्या उघडपणे रंगमंचावर आणणे हे सुद्धा एक कौतुकच. आणि या विषयाला चार चांद लावले ते पंडित अभिषेकींनी. दोन घराण्यातील सांगीतिक भेद, वेगवेगळी सौंदर्यस्थानं आणि नाटकातील द्वंद्व अगदी ठसठशीतपणे उभं केलं आपल्या पदांमधून.

    katyar_kaljat_ghusali_ver6

    आणि नुकताच ३० तारखेला याच नाटकावर आधारित अफलातून चित्रपट Zee5 वर रिलीज झाला. सुबोध भावे पुन्हा एकदा ही अजरामर कलाकृती मराठी रसिकांसमोर घेऊन आला “कट्यार काळजात घुसली” या चित्रपटातून. जसं हे नाटक रुपेरी पडद्यावर उभं करणं मोठं कौशल्याचं आणि जबाबदारीचं काम होतं तसंच त्याचं संगीत निर्माण करणं एखाद्या शिवधनुष्यासारखच होतं. अभिषेकी बुवांनी संगीत दिलेली आणि वसंतरावांनी अजरामर केलेली पदं पुन्हा रेकॉर्ड करणं आणि शिवाय मूळ चालींमध्ये मिसळून जाईल अशा नव्या चाली बांधणं आजिबात सोपं काम नव्हतं. पण शंकर एहसान लॉय या त्रिकुटानी हे शिवधनुष्य नुसतं पेललं नाही तर त्यावर प्रत्यंचाही चढवली. मूळ नाटकातील ‘या भवनातील गीत पुराणे’ या पदाच्या ऐवजी येणार ‘दिल की तपिश’ हे  गाणं अगदी खांसाहेब आफताब हुसेन यांच्या गायकीचे होऊन गेले आहे. आज अभिषेकी बुवा असते तर त्यांनी या चालीसाठी तिघांचे अफाट कौतुक केलं असतं.

    तसे पाहिले तर सारेच भारतीय चित्रपट संगीत प्रधानच. त्यामुळे पाश्चात्य जगात असलेली musical film ही संकल्पना आपल्याकडे वेगळी अशी निर्माणच नाही झाली. पण तरीही मराठी चित्रपटातून काही संगीताच्या सभोवती कथा गुंफलेले काही चित्रपट आधीही होऊन गेले. लोकशाहीर राम जोशी, पिंजरा, आणि काही वर्षांपूर्वी आलेला नटरंग हे चित्रपट महाराष्ट्राच्या लावणीभोवती गुंफले गेले. पण प्रामुख्याने तथाकथित पांढरपेशा समाज आणि तमाशा यांच्यात असलेली दरी मोडून कुण्या एकाचा त्या क्षेत्रात निषिद्ध मानला गेलेला प्रवास या एका समान धाग्याने हे चित्रपट बांधले गेले आहेत.

    या व्यतिरिक्त २००९ मध्ये आलेला जोगवा हा यल्लम्मा देवीच्या नावाने जोगवा मागत फिरणाऱ्या जोगत्यांच्या आयुष्यावरचा एक राष्ट्रीय पुरस्कार मिळवलेला चित्रपट. हे जोगते देवीची भजनं, जोगवे गात गात जोगवा मागत आयुष्य घालवत असल्याने या चित्रपटाची धाटणी सुद्धा एक musical चीच आहे. पण कट्यार… चा विषय आणि सांगीतिक संदर्भच त्याला या साऱ्या चित्रपटांपासून वेगळा काढतो.

    नाही म्हणायला Morning Raga हा शबाना आझमी यांची भूमिका असलेला चित्रपट शास्त्रीय संगीताची बाजू चित्रपटांमध्ये घेऊन आला होता. आजच्या काळात जेव्हा आधुनिक संगीताचा बोलबाला आहे, रॉक मेटल वगैरे संगीत मोठ्या प्रमाणावर सादर होतं अशा वातावरणात शबाना आझमींच्या पात्राला त्यांचे कर्नाटक शास्त्रीय संगीत एक मोठया कार्यक्रमात सादर करायची महत्वाकांक्षा घेऊन जगत असते. पण कट्यारमधली महत्वाकांक्षा आपल्याला एका निराळ्याच जगात घेऊन जाते. कट्यारची गोष्ट उलगडते ती राजेरजवाड्यांच्या काळात जेव्हा कला आणि कलाकार राजाश्रयाने वाढत होती. ही एक अप्रस्थापित संगीतशैलीची प्रसिद्धीसाठीची महत्वाकांक्षा आहे.

    ही महत्वाकांक्षा, एक वेगळ्याच पातळीवरचे अटीतटीचे सांगीतिक द्वंद्व, मानवी स्वभावाचे ईर्षा, असूया, प्रेम, कालासक्ती असे वेगवेगळे पदर हे सारे एक चित्रपटातून दाखवतांना नाटकात उपलब्ध नसलेलं स्थल स्वातंत्र्य या वेळी सुबोध भावेंनी दिग्दर्शक म्हणून फार सुंदरपणे हाताळले आहे. मला खात्री आहे की हा चित्रपट आपण सर्वांनी चित्रपटगृहांमध्ये जाऊन पहिला असेलच. पण इतकी सुंदर कलाकृती पुनःपुन्हा पाहण्याची संधी आता आपल्या अगदी दारात चालून आली आहे. तेव्हा ही संधी तुम्ही आजिबात दवडू नका आणि अभिषेकी बुवांच्या पदांसोबतच शंकर एहसान लॉय यांच्या गाण्यांचा, सुबोध भावे, सचिन पिळगांवकर, मृण्मयी देशपांडे, अमृता खानविलकर आणि प्रथमच अभिनय करणारे शंकर महादेवन यांच्या उत्तम अभिनयाचा आनंद घरबसल्या हवं तेव्हा नक्की घ्या.