Tag: poem

  • कविता

    कविता खरंच अशी ठरवून होत नाही,
    लगेच जमायला ती काही २ + २ नाही.

    मनातल्या भावनांना कवितारुप येणं,
    हे तर त्या माता सरस्वतीच देणं.

    कधी एकामागून एक येते लाट,
    कधी मनातला चातक बघतो वाट.

    कवितेला असते कधी नाजूक किनार,
    तर येते कधी परिस्थितीची वज्रधार.

    जपलं जातं कधी कधी गुलाबी स्वप्नं,
    तर कधी व्यक्त होतं भयाण दुःस्वप्न.

    तरीही कविता असते मनाच्या जवळ,
    आनंदाने भरून जाते आपली पूर्ण ओंजळ.

error: Content is protected !!